नवी दिल्ली : इराणच्या ताब्यात असलेल्या जवळपास ४० सागरी कर्मचाऱ्यांची सुटका करावी असे आवाहन भारताने केल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी दिली. गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत चार निरनिराळ्या व्यापारी जहाजांवरून या कर्मचाऱ्यांना इराणने ताब्यात घेतले आहे.

बंदर, जहाज वाहतूक आणि जलमार्ग विभागाचे मंत्री सर्बानंद सोनोवल यांनी सोमवारी तेहरानमध्ये इराणचे परराष्ट्रमंत्री होसेन आमिर अब्दुलाहियन यांच्याबरोबर झालेल्या भेटीत ही विनंती केली. भारताच्या बाजूने विनंती करण्यात आल्यावर या बैठकीचे आयोजन करण्यात आले असे या घडामोडींची माहिती असणाऱ्या सूत्रांनी दिली. यावेळी इराणच्या ताब्यात असलेल्या सर्व भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका करण्याची विनंती सोनोवल यांनी केली. त्यावर अब्दुलाहियन यांनी सोनोवल यांना सांगितले की, या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यास इराण सकारात्मक आहे. मात्र, कायदेशीर प्रक्रियांचे पालन करणे आवश्यक असल्याने त्याला उशीर होत आहे.

tanishq and de beers collaboration to boost India s natural diamond jewellery market
डी बीयर्सशी भागीदारीतून हिऱ्यांच्या ग्राहकांमध्ये दुपटीने वाढीचे तनिष्कचे लक्ष्य
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
private guards stopped tourists for taking rare bird photo at wetland near palm beach road
पाणथळ जागेवर छायाचित्रणास मज्जाव! नवी मुंबईत विकासकाच्या सुरक्षारक्षकांकडून पर्यावरणप्रेमींची अडवणूक
Prime Minister Narendra Modis visit to Poland and Ukraine is for the future
मोदींची पोलंड, युक्रेन भेट ‘मध्यस्थी’साठी नव्हे… भवितव्यासाठी!
indian varieties of mango grown in china
विश्लेषण : आंबा निर्यातीत भारत-चीन आमने-सामने कसे? भारतीय आंब्यांचीच निर्यात चीन कशी करतो?
Sheikh Hasina head of state in Bangladesh in the Indian subcontinent has always faced conflict
उठाव, बंड, हत्या… भारतीय उपखंडातील महिला राष्ट्रप्रमुखांच्या वाट्याला नेहमीच संघर्ष?
Who killed Ismail Haniyeh the leader of the political wing of Hamas in Tehran
इस्माईल हनियेची हत्या कुणी केली? शत्रुराष्ट्रातील महत्त्वाच्या लोकांना टिपून मारण्याचा इस्रायलचा इतिहास काय सांगतो?
turki 40 lakh dogs death
‘या’ देशात सरकार ४० लाख कुत्र्यांची हत्या करणार? कारण काय? त्यासाठी का पडली नवा कायदा करण्याची गरज?

सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले छाबार हे इराणमधील बंदर कार्यरत करण्यासाठी भारताने इराणबरोबर १० वर्षांचा करार केला आहे. त्यासाठी सोनोवल इराणच्या दौऱ्यावर असताना ही भेट झाली.

हेही वाचा >>> स्लोवाकियाचे पंतप्रधान गोळीबारात गंभीर जखमी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत इराणने निरनिराळ्या आरोपांखाली ‘स्टिव्हन’, ‘ग्लोबल शेरिलिन’, ‘मार्गोल’ आणि ‘एमएससी एरिस’ ही चार व्यापारी जहाजे आणि त्यावरील कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. यापैकी ‘स्टिव्हन’ हे जहाज १२ सप्टेंबर २०२३ रोजी तस्करीच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले होते. त्यावर नऊ भारतीय कर्मचारी होते. त्यापैकी तिघांना इराणी अधिकारी २४ एप्रिलला इतरत्र घेऊन गेले. आता त्यांचा ठावठिकाणा ज्ञात नाही. यापैकी कोणालाही वकिलातीशी संपर्क साधता आला नाही.

‘ग्लोबल शेरिलिन’ या ११ डिसेंबरला इंधन तस्करीच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आलेल्या जहाजावर २० भारतीय कर्मचारी होते. त्यांना भारतीय वकिलातीशी संपर्क साधण्याची परवानगी देण्यात आली होती.

‘मार्गोल’ हे जहाजही इंधन तस्करीच्या आरोपावरून २२ जानेवारीला ताब्यात घेण्यात आले होते. या जहाजावरील १२ भारतीय कर्मचाऱ्यांची यापूर्वीच सुटका झाली आहे. मात्र, जहाजाचे कप्तान सुजित सिंह हे अजूनही इराणच्या ताब्यात आहेत. त्यांना भारतीय वकिलातीशी संपर्क साधण्याची परवानगी मिळाली नाही. त्यांच्यावर २० कोटी रुपयांचा दंड लादण्यात आला आहे.

‘एमएससी एरिस’ हे जहाज इस्रायलशी संबंधित असल्याच्या आरोपावरून १३ एप्रिल रोजी ताब्यात घेण्यात आले असून त्यावर १७ भारतीय कर्मचारी होते. त्यापैकी अॅन तेसा जोसेफ या महिला कॅडेटसह सहा जणांची सुटका करण्यात आली आहे.