करोना महासाथी संपल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. उद्योग, सेवा क्षेत्रामध्ये वाढ होताना दिसत आहे. असे असतानाच देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनामध्ये २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रत्यक्ष कर संकलन दिवसेंदिवस वाढत असून चालू आर्थिक वर्षात हा आकडा ७ लाख कोटींच्या पुढे पोहोचला आहे.

हेही वाचा >>> NIA ची मोठी कारवाई! तब्बल २३ पथकांची आंध्र प्रदेश, तेलंगाणामध्ये छापेमारी; PFIच्या सदस्यांना घेतले ताब्यात

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

याबाबतची माहिती देण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. भारत सरकारच्या धोरणांमुळे कर संकलनात वाढ होत आहे. तसेच कर आकारणी पद्धतीला आणखी साधे, सरळ आणि सोपे करण्याच्या सरकारचा प्रयत्न आहे. करगळती थांबवण्याठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग केला जात आहे, या सर्व गोष्टींमुळे प्रत्यक्ष कर संकलनात वाढ होण्यास मदत होत आहे, असे केंद्र सरकारच्या निवेदनात म्हणण्यात आले आहे.

हेही वाचा >>> पंजाब : चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ लीक, खळबळजनक घटनेनंतर विद्यार्थिनी आक्रमक

निवेदनात दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये १७ सप्टेंबर २०२२ पर्य़ंत ७ लाख ६५९ कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलन झाले आहे. मागील आर्थिक वर्ष २०२१-२२च्या तुलनेत हे करसंकलन २३ टक्क्यांनी जास्त आहे. यामध्ये कॉर्पोरेशन कर (३ लाख ६८ हजार ४८४ लाख कोटी रुपये) आणि सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (३ लाख ३० हजार ४९० लाख कोटी) तसेच वैयक्तिक आयकर (PIT) यांचा समावेश आहे. याच काळात आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ५ लाख ६८ हजार १४७ लाख कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलन झाले होते.

Story img Loader