S. Jaishankar to Europeon Union : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा युरोपीय राष्ट्रांना जागतिक बाबींवरील त्यांच्या दुटप्पी भूमिकेवरून फटकारलं आहे. भारताला उपदेशकांची नाही तर भागीदारांची गरज असल्याचं म्हटलंय. युरोपियन यूनियन भागीदाराकडून नवी दिल्लीच्या अपेक्षा आणि युरोपीय गटाच्या सर्वसाधारण भूमिकेला जयशंकर यांनी उत्तर दिलं. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

भारताला सहकार्याची गरज

“जेव्हा आपण जगाकडे पाहतो, तेव्हा आपण भागीदारी (सहकार्य) शोधतो. आपण धर्मोपदेशकांना शोधत नाही. धर्मोपदेशक जे उपदेश करतात ते स्वतः आचरणात आणत नाहीत. मला वाटतं की काही युरोपीय देश अजूनही त्या समस्येशी झुंजत आहेत. त्यातील काही बदलत आहेत, असं जयशंकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “तर आमच्यासाठी मुद्दा म्हणजे अनेक प्रकारे युरोपने वास्तव तासणीच्या एका विशिष्ट क्षेत्रात प्रवेश केला आहे. आता ते त्याकडे पाऊल टाकू शकतात की नाही हे आपल्याला पाहावं लागेल.”

जर बीजिंगशी समस्या वाढल्या तर युक्रेनवरील नवी दिल्लीच्या भूमिकेमुळे त्याला मिळणाऱ्या जागतिक पाठिंब्यावर परिणाम होऊ शकतो, या युरोपीय धोरणाला नकार देत, जयशंकर यांनी २०२२ मध्ये म्हटलं होतं की भारताचे चीनशी कठीण संबंध आहेत, परंतु, ते व्यवस्थापित करण्यास पूर्णपमे सक्षम आहेत. त्यांनी पुढे म्हटलं होतं की, युरोपने या मानसिकतेतकून बाहेर पडावं की त्यांच्या समस्या या जगाच्या समस्या आहेत, परंतु जगाच्या समस्या युरोपच्या समस्या नाहीत.