बऱ्याचदा काहीजण हालाकीच्या परिस्थितीमुळे चोरीचा मार्ग स्वीकारतात. अशाच एका राजस्थानमधल्या चोराला पाहुन कदाचित तुम्हाला त्याचा राग येणार नाही. या चोराने मिठाईच्या दुकानात शिरून मिठाई खाल्ली. तसेच दुकानातील पैशांचा गल्ला देखील तो घेऊन गेला आहे. परंतु ते करण्यापूर्वी चोराने दुकानदाराच्या नावाने दोन पानी पत्र लिहिलं आहे. यामध्ये चोराने स्वतःला ‘अतिथी’ म्हटलं आहे. दुसऱ्या दिवशी मिठाईच्या दुकान मालकाने या प्रकरणाची पोलिसांना माहिती दिली.

हे प्रकरण भणियाणा मुख्यालयातील बाजारात घडलं आहे. येथील मिठाईच्या दुकानात बुधवारी रात्री एक चोर भींत पाडून आत शिरला. त्यानंतर त्याने दुकानातली मिठाई खाल्ली आणि पैशांचा गल्ला घेऊन तो फरार झाला. परंतु हे करण्यापूर्वी त्याने दुकान मालकाच्या नावाने एक पत्र सोडलं आहे.

Environmentalists allege that some trees were uprooted outside the Metro 3 station
‘मेट्रो ३’ स्थानकाबाहेरील काही वृक्ष उन्मळून पडल्याने पर्यावरणप्रेमींचा आरोप
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
pune dry fruits theft
आंबा बर्फीनंतर चोरट्यांच्या सुकामेव्यावर ताव; वारज्यातील दुकानातून रोकड, सुकामेव्याची पाकिटे लंपास
villagers protested against daighar garbage project
ठाण्यात पुन्हा कचराकोंडीची चिन्हे; डायघर प्रकल्पास ग्रामस्थांचा विरोध, देयके मिळत नसल्याने ठेकेदाराने रोखल्या घंटागाड्या
thieves broke sweet shop lock and stole cash and two and a half kilos mango barfi
पुणे : चोरट्यांचा आंबा बर्फीवर ताव; मिठाई विक्री दुकानातून रोकड, अडीच किलो आंबा बर्फी चोरीस
Wardha dead bodies reservoir, Wardha,
वर्धा : जलाशयात आढळले तीन मृतदेह, दोघांची ओळख पटली; पूरबळी संख्या सात
young man named Ayub Sheikh brutally murdered on Malanggad road on Monday night due to past enmity
कल्याणमध्ये पूर्ववैमनस्यातून तरूणाचा खून
Mumbai: Leopard Spotted Rolling & Relaxing In Bushes Of Aarey Milk Colony
VIDEO: मुंबईतील ‘आरे’मध्ये दिसला बिबट्या अन्…; मध्यरात्री बिबट्या रस्त्याच्या कडेला काय करत होता पाहा

पत्रात चोराने काय लिहिलंय?

पत्रात चोराने लिहिलं आहे, “नमस्कार साहेब, मी एक चांगल्या मनाचा माणूस आहे. मी तुमच्या दुकानात चोरी करण्यासाठी नव्हे तर स्वतःची एक इच्छा पूर्ण करण्यासाठी आलो घुसलो. मी कालपासून जेवलो नाही. मला खूप भूक लागली आहे. मी तुमच्या दुकानात पैसे चोरण्यासाठी नव्हे तर केवळ माझी भूक मिटवण्यासाठी आलो आहे.”

चोराने पत्रात दुकानदाराला उद्देशून लिहिलं आहे की, “मला माहिती आहे की, तुम्ही गरीब आहात, म्हणून दिलासा देण्यासाठी तुम्हाला हे पत्र लिहितोय. मी तुमचा पैशांचा गल्ला घेऊन जातोय. माी तुमच्या दुकानात जास्त काही खाल्लं नाही. केवळ तोन पांढऱ्या मिठाई आणि दोन पीस आग्र्याचा पेठा खाल्ला आहे. तुम्ही या चोरीसाठी पोलिसात तक्रार करू नका. तुमचा अतिथी.”

हे ही वाचा >> गर्लफ्रेंडला कारमध्ये बसवलं, निर्जन स्थळी नेलं आणि ५० लाखांची मर्सिडीज पेटवली

दुकानदाराने पोलिसांत तक्रार दाखल केली नाही

दुसऱ्या दिवशी जेव्हा दुकनदार गोमाराम मिठाईच्या दुकानात आले तेव्हा त्यांना दुकानाची मागची भींत पडलेली दिसली. तसेच दुकानात दोन पानांचं पत्र देखील मिळालं. त्यानंतर गोमाराम यांनी पोलिसांना या चोरीची माहिती दिली. चोरीची माहिती मिळताच भणियाणा पोलीस ठाण्याचे अधिकारी अशोक कुमार घटनास्थळी पोहोचले. आता पोलीस चोराचा तपास करत आहेत. गोमाराम यांनी पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही. परंतु पोलीस चोराचा शोध घेत आहेत. चोर अद्याप फरार आहे.

चोराला केवळ सफरचंद हवं होतं

खरंतर चोर बाजूच्या भाज्यांच्या दुकानात घुसला होता. त्याला सफरचंद हवं होतं. ते मिळालं नाही म्हणून तो मिठाईच्या दुकानात शिरला.