हाजीपूरमध्ये साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची हत्या करण्यात आल्याबद्दल केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी बिहारमधील नितीशकुमार सरकारवर टीका केली आहे. अशा प्रकारच्या हत्येमुळे राज्यात पुन्हा जंगलराज आल्याचे आणि नितीशकुमार असहाय झाल्याचे स्पष्ट होत आहे, असेही पासवान यांनी म्हटले आहे.
बिहारमध्ये पोलीसच असुरक्षित आहेत, तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचे काय, नितीशकुमार इतके असहाय का झाले आहेत आणि ते का गप्प राहिले आहेत, असे सवालही पासवान यांनी केले आहेत. पासवान हे हाजीपूरचे खासदार असून ते रविवारी मतदारसंघाचा दौरा करून स्थितीची पाहणी करणार आहेत. हाजीपूरमध्ये अशा प्रकारची तिसरी घटना घडली आहे, असेही ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jan 2016 रोजी प्रकाशित
बिहारमध्ये पुन्हा ‘जंगलराज’ पासवान यांची टीका
नितीशकुमार असहाय झाल्याचे स्पष्ट होत आहे, असेही पासवान यांनी म्हटले आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 10-01-2016 at 01:47 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jangalaraja in bihar