सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कर्तारपूर कॉरिडॉर हा एक भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव दूर करण्याचा मार्ग ठरु शकतो. कारण याप्रकरणी चर्चेसाठी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांचे एक पथक लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव हे आपल्या जीवनाच्या शेवटच्या काळात सध्या पाकिस्तानात असलेल्या कर्तारपूर गुरुद्वार दरबार साहिबपर्यंत भारतीयांना दर्शनासाठी जाता यावे यासाठी भारतातील भाविकांना व्हिसाशिवाय पाकिस्तानात जाता येणार आहे. यासंबंधी दोन्ही देशांमध्ये करारावर १४ मार्च रोजी सह्या होणार आहेत. त्यासाठी पाकिस्तानचे एक पथक दिल्लीला येणार आहे. पाकिस्तानकडून अधिकृतरित्या ही माहिती देण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते महंम्मद फैझल यांनी भारताचे उच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांनी माहिती दिली. त्याचबरोबर भारतालाही या कॉरिडॉर संबंधी चर्चेसाठी पाकिस्तानात येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

१५२२ मध्ये गुरुनानक यांनी कर्तापूर येथे पहिले गुरुद्वारा स्थापन केले तसेच इथेच त्यांनी आपला शेवटचा श्वासही घेतला. त्यामुळे शीख समुदायासाठी हे ठिकाण खूपच महत्व आहे. सध्या हे स्थान भारतीय सीमेपासून ४ किमी लांब पाकिस्तानात स्थित आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kartarpur corridor will eliminate tension in both countries pakistan officials to visit india
First published on: 06-03-2019 at 06:50 IST