अदाणी समूह प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला होता. याच प्रकरणी आता राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाने नोटीस बजावली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत नोटीशीला उत्तर देण्यास लोकसभा सचिवालयाने सांगितलं आहे.

भाजपा नेते निशिकांत दुबे आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राहुल गांधी यांच्यावर विशेषाधिकाराचा भंगचा आरोप केला होता. त्याप्रकरणी लोकसभा सचिवालयाकडे तक्रार नोंद केली होती. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस जारी केली आहे.

Parambans Singh Romana on Narendra Modi
“आज ते असतील तर उद्या आपणही…”; मोदींच्या ‘त्या’ विधानावरुन शिरोमणी अकाली दल आक्रमक
MP Rahul Gandhi On PM Narendra Modi
पंतप्रधान मोदींना राहुल गांधींचं आव्हान; म्हणाले, “फक्त एवढंच समजून सांगा…”
Pm Narendra Modi On Congress Manifesto
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, “जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगची…”
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका

हेही वाचा : अमेरिका-कॅनडा सीमेवर हेरगिरी? हवाई दलाने पाडलं चौथं फ्लाईंग ऑब्जेक्ट, बायडेन आक्रमक

खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींच्या भाषणावर विशेषाधिकार भंगाची नोटीस जारी केली होती. तसेच, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहित नियम ३८० नुसार राहुल गांधींच्या भाषणातील असंसदीय, असन्माननीय आरोप लोकसभेच्या कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली होती.

हेही वाचा :

राहुल गांधी काय म्हणाले होते?

राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर उत्तर देताना राहुल गांधींनी अदाणी प्रकरणावरून पंतप्रधान मोदींवर टीकास्र सोडलं. “मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर जाऊन येतात आणि संरक्षण क्षेत्रातील अनेक कंत्राटे अदानींच्या कंपन्यांना मिळतात. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना देशातील उद्योगजगत त्यांच्या विरोधात होते. त्या काळात अदानी मोदींच्या पाठीशी उभे राहिले. तेव्हा त्यांचे नाते स्थानिक होते, मग गुजरातव्यापी झाले. मोदी पंतप्रधान झाल्यावर हे नाते राष्ट्रीय झाले, आता तर ते आंतरराष्ट्रीय झाले आहे,” असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.