बोलपूर : नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी विश्व भारतीतील एका भूखंडावर ‘अनधिकृत ताबा’ मिळवला असल्याचा आरोप होत असताना, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी या जमिनीशी संबंधित कागदपत्रे सेन यांना सोपवली. भविष्यात कुणीही त्यांना याबाबत प्रश्न विचारू शकणार नाही, असे ममता यांनी आवर्जून सांगितले.

अमर्त्य सेन यांनी शांतिनिकेतनमध्ये ‘अनधिकृत रीतीने’ ज्या भूखंडावर ताबा मिळवला आहे, त्याचे भाग तत्काळ आपल्याला सोपवावे, असे विश्व भारतीने गेल्या आठवडय़ात सेन यांना पत्र पाठवून सांगितले होते.

केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा

सोमवारी दुपारी बोलपूरला पोहचलेल्या ममता यांनी सेन यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याविरुद्ध करण्यात आलेले आरोप ‘निराधार’ असल्याचे सांगितले. सेन यांना भविष्यात ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा पुरवली जाईल असेही त्यांनी जाहीर केले.

‘त्यांच्याविरुद्धचे (अमर्त्य सेन) आरोप निराधार आहेत. हा त्यांची प्रतिष्ठा डागाळण्याचा प्रयत्न आहे. त्यांचा अपमान करण्याचा कुणालाही अधिकार नाही. आम्ही हे खपवून घेणार नाही’, असे सेन यांच्या शेजारी बसलेल्या बॅनर्जी यांनी सांगितले. ‘मी विश्व भारतीचा आदर करते, मात्र या पवित्र संस्थेच्या भगवेकरणाच्या प्रयत्नांचा निषेध करते’, असे ममता म्हणाल्या.