Crime News : उत्तर प्रदेशच्या फरीदाबाद येथे मंगळवारी बल्लबगड रेल्वे स्थानकाच्या जवळ रेल्वेने चिरडल्याने ३६ वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या ४ मुलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ही घटना म्हणजे हत्या आणि आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या ५ जणांच्या मृत्यूनंतर या व्यक्तीच्या पत्नीची चौकशी केली त्यामध्ये या व्यक्तीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता असे आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे
मनोज महतो हा मजूर म्हणून काम करत असे, दुपारी त्याने त्याच्या पत्नीला तो मुलांना त्याच्या फरीदाबाद येथील सुभाष कॉलनी परिसरातील त्यांच्या घराच्या जवळच्या एका पार्कमध्ये घेऊन जात असल्याचे सांगितेल होते.
पण मनोज हा दुपारी १२.३० वाजता त्याच्या तीन, सहा, नऊ आणि १० वर्षे वय असलेल्या त्याच्या चार मुलांना घेऊन २०० मीटर अंतरावर असलेल्या रेल्वे रुळांवर घेऊन गेला. मनोज महतो हा ट्रेन कधी येणार याची वाट बघत थांबला, इतकेच नाही थर या काळात त्याने मुलांना चिप्स आणि कोल्ड ड्रिंक्स देखील विकत घेऊन दिले, असेही पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी काय सांगितले?
“ते रोडवरून दिसणार नाहीत अशा ठिकाणी होते. बल्लभगड रेल्वे स्थानकापासून दीड किलोमीटर दक्षिणेकडे ते बसलेले होते. गोल्डन टेम्पल एक्सप्रेस येत असताना त्याने मुलांना घट्ट पकडून ठेवले,” असे फरीदाबाद सरकारी रेल्वे पोलीस (जीआरपी) स्टेशन हाऊस ऑफीसर राज पाल यांनी सांगितले.
त्या सर्वांच्या अंगावरून रेल्वे गेली आणि मुलांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरड केली, पण हे ठिकाण निर्जन असल्याने त्यांच्या मदतीसाठी कोणीच धावून आले नाही, असेही त्यांनी सांगितले.
लोको पायलटने यानंतर तात्काळ माहिती दिली आणि त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्यांना महतो आणि त्याच्या पत्नीचे आधार कार्ड सापडले. यानंतर पोलिसांनी कार्डवर असलेल्या फोन नंबरवून त्याच्या पत्नीशी संपर्क साधला.
यानंतर ती घटनास्थळी दाखल झाली, मिळालेल्या माहितीनुसार ही महिला पती आणि तिच्या चार मुलांचे मृतदेह पाहून बेशुद्ध पडली. शवविच्छेदनासाठी हे मृतदेह नंतर बादशाह खान सिव्हील रुग्णालयात घेऊन जाण्यात आले.
नेमकं कारण काय?
प्राथमिक चौकशीत समोर आले की तो महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत असे. तो तिला फोनवरून दुसऱ्या पुरुशांशी बोलताना पाहून संशय घेत असे. त्यामुळे सध्यातरी यामागचे हेच कारण दिसून येत आहे, अशे राज पाल म्हणाले.
“आत्तापर्यंत या प्रकरणात एफआयआर किंवा तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. कथित कारण देखील फक्त पत्नीने सांगितले आहे. आम्ही सध्या तिच्याशी बोलत आहोत,” असे फरीदाबादचे जीआरपी डीएसपी राजेश कुमार चेची यांनी सांगितले.