लोकसभा निवडणुकीदरम्यान नक्षलवाद्यांकडून माझ्या जिवाला धोका आहे. मला सुरक्षा पुरवणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. मात्र सरकारकडून पुरेशी सुरक्षा पुरवण्यात आलेली नाही, असा आरोप झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी केला.
सध्या मरांडी झारखंड विकास मोर्चा(प्रजातांत्रिक) या पक्षाचे अध्यक्ष असून, निवडणुकीचा प्रचार करताना नक्षलवाद्यांकडून माझी हत्या केली जाऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. नोव्हेंबर २००७मध्ये नक्षलवाद्यांनी मरांडी यांच्या मुलाची हत्या केली होती, याची आठवणही मरांडी यांनी सांगितली. मरांडी यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Mar 2014 रोजी प्रकाशित
नक्षलवाद्यांकडून माझ्या जिवाला धोका -मरांडी
लोकसभा निवडणुकीदरम्यान नक्षलवाद्यांकडून माझ्या जिवाला धोका आहे. मला सुरक्षा पुरवणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. मात्र सरकारकडून पुरेशी सुरक्षा पुरवण्यात आलेली नाही,
First published on: 14-03-2014 at 12:02 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marandi fears bid on life during ls elections