मजूर आणि कामगारांच्या हिताकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असून त्यांना हक्काचे वेतन आणि अन्य लाभही देण्यात आलेले नाहीत, असा आरोप भारतीय मजदूर संघाने (बीएमएस) केला आहे. या अन्यायाविरोधात पूर्ण ताकदीनिशी आवाज उठविण्याचे ठरविण्यात आल्याने पुढील दशक संपवर्षांचे असेल, असा इशाराही ‘बीएमएस’ने दिला आहे.
केंद्र सरकार कामगारांच्या हिताच्या विरोधात भूमिका घेत आहे, अनेकांना हक्काचे वेतन आणि अन्य लाभांपासूनही वंचित ठेवत आहे, असा आरोप बीएमएसचे अध्यक्ष सी. के. साजी नारायणन यांनी संघाच्या राष्ट्रीय परिषदेत येथे केला.
केंद्र सरकारची धोरणे कामगारविरोधी आणि शेतकरीविरोधी आहेत, अर्थ आणि वाणिज्यमंत्र्यांसह अनेक मंत्री कामगार मंत्रालयावर कामगारविरोधी धोरणे आणण्यासाठी दबाव आणत आहेत. कामगारांचे किमान वेतन दरमहा १० हजार रुपये करावे, अशी मागणी करून नारायणन यांनी, राष्ट्रीय किमान वेतन मर्यादेच्या संकल्पनेला विरोध दर्शविला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Next decade will be years of strikes bharatiya mazdoor sangh
First published on: 22-02-2014 at 01:37 IST