भाजपशी काडीमोड घेतल्यानंतरही बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न मिळावा या भाजपच्या सुरात सूर मिसळला आहे.वाजपेयी त्या पुरस्कारासाठी योग्य आहेत, त्यांना तो का मिळायला नको? असा प्रतिप्रश्न त्यांनी याबाबत प्रतिक्रिया विचारली असता विचारला. याखेरीज राममनोहर लोहिया आणि कर्पुरी ठाकूर यांनाही भारतरत्न मिळायला हवे, अशी मागणी नितीशकुमारांनी केली आहे. सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिल्याबद्दल नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तिवारी यांच्या मताशी नितीशकुमार यांनी अहसमती दर्शवली. सचिनचे योगादान मोलाचे आहे, असे नितीशकुमार यांनी सांगितले. राजकीय नेतृत्व अक्कलशून्य आहे, अशी टीका भारतरत्न सीएनआर राव यांनी केली होती. त्याबाबत विचारले असता, राव हे महान शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या उत्तम कामाबद्दल आपण चर्चा करू, अशी प्रतिक्रिया नितीशकुमार यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 19th Nov 2013 रोजी प्रकाशित
वाजपेयींना भारतरत्नसाठी नितीशकुमार यांचा पाठिंबा
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न देण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या मागणीला बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी पाठिंबा दिला.
First published on: 19-11-2013 at 12:50 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish backs bjps demand of bharat ratna for vajpayee