आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शारदा घोटाळ्याचा परिणाम तृणमूल काँग्रेसच्या कामगिरीवर होणार नाही, असा दावा पक्षाचे सरचिटणीस मुकुल रॉय यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीतही तृणमूलने ४२ पैकी ३४ जागाजिंकल्याची आठवण त्यांनी करून दिली. यावर्षी कोलकाता महापालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सप्टेंबरमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीतही तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला होता हे रॉय यांनी स्पष्ट केले. राज्यात भाजपने तृणमुलला आव्हान देण्याची तयारी चालवली आहे.