पाकिस्तानशी चर्चा करण्याची भारताची इच्छा आहे असा संदेश भारताने पाठविल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने केला. त्याचे भारताने गुरुवारी जोरदार खंडन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशा प्रकारचा कोणताही संदेश भारताने पाठविलेला नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले.

इम्रान खान यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसुफ यांनी वरील दावा एका वृत्त संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी केला होता त्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीवास्तव यांनी त्याचे खंडन केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No message sent to pakistan for discussion ministry of external affairs abn
First published on: 16-10-2020 at 00:31 IST