पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’ पक्षाचे (पीटीआय) प्रमुख इम्रान खान यांनी एक मोठी घोषणा केली आहे. विधीमंडळातील ‘पीटीआय’च्या सर्व जागा सोडण्याचा निर्णय खान यांनी जाहीर केला आहे, असं वृत्त पाकिस्तानच्या ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने दिले आहे. देशात लवकरात लवकर निवडणूक घेण्यास सत्ताधाऱ्यांना भाग पाडण्यासाठी खान यांच्याकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.

रावळपिंडीत झालेल्या जाहीर सभेत सर्व जागांचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं इम्रान खान यांनी सांगितलं आहे. ७० वर्षी इम्रान खान यांनी या जागा सोडण्याबाबत राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. “आपल्या देशाचे नुकसान करण्याऐवजी ही भ्रष्ट व्यवस्था सोडून जाणेच योग्य आहे”, असे खान यांनी म्हटले आहे.

Delhi Lieutenant Governor V K Saxena
राज्यपालांचा एक आदेश अन् महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी! माजी अध्यक्षांवर केला गंभीर आरोप
Sharad Pawar criticism that Narendra Modi has no moral right to demand the power of the country again
नरेंद्र मोदींना देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार नाही; शरद पवारांचा हल्लाबोल
misa bharti attacks pm modi
“…तर पंतप्रधान मोदींसह भाजपा नेत्यांना तुरुंगात टाकू”; मीसा भारती यांचे विधान, भाजपानेही दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप

Asia Cup 2023: ‘…तर भारताला पाकिस्तानशिवाय विश्वचषक खेळावा लागेल!’ रमीझ राजा यांनी पुन्हा एकदा ओकली गरळ

पक्षाचा ‘हकेकी आझादी’ मोर्चा इस्लामाबादच्या दिशेने जाणार नाही, असेही खान यांनी स्पष्ट केले आहे. देशात अराजकता माजू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे. “आम्हीही श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण करू शकलो असतो. पण इस्लामाबादचा मोर्चा सरकारला परवडणारा नाही. ते लाखो लोकांना इस्लामाबादमध्ये प्रवेश करण्यापासून रोखू शकत नाहीत. जर दंगली भडकल्या तर परिस्थिती सर्वांच्याच हाताबाहेर जाईल. त्यामुळे देशात अराजकता माजेल, असं कुठलंही पाऊल मला उचलायचं नाही”, असं खान म्हणाले आहेत.