जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ताफ्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जम्मू- काश्मीरमध्ये आता केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि भारतीस सैन्य अशा तिन्ही दलांचा ताफा एकाच वेळी निघणार आहे. ज्या मार्गावरुन हा ताफा जाईल, त्या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या आठवड्यात जैश- ए- मोहम्मदच्या दहशतवाद्याने सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला होता. स्फोटकांनी भरलेल्या कारने ताफ्यातील बसला धडक दिली होती. सुटी संपवून सेवेत रुजू होणाऱ्या २,५४७ जवानांना ७० वाहनांतून नेले जात होते. दर खेपेस हजार जवानांना नेले जाते, पण यावेळी ही संख्या दुपटीपेक्षा जास्त होती. या पार्श्वभूमीवर सीआरपीएफ, जम्मू- काश्मीर पोलीस, भारतीय सैन्य आणि बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात जवानांच्या ताफ्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pulwama terror attack crpf army bsf convoys move together in jammu and kashmir
First published on: 21-02-2019 at 09:59 IST