नेतेमंडळींच्या वादग्रस्त विधानांमुळे यंदाची लोकसभा निवडणुका गाजत असतानाच योगगुरू रामदेव बाबा यांच्या वक्तव्यामुळे आता नवा वाद उद्भवला आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींचे लग्न न झाल्यामुळे ते दलितांच्या घरी हनिमून आणि पिकनिकसाठी जातात असे वक्तव्य करून रामदेव बाबा यांनी खळबळ उडवून दिली आहे. या वक्तव्याबद्दल रामदेव बाबांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली. तर काँग्रेसचे महासचिव दिग्विजयसिंह यांनी रामदेव बाबांचे मत दलित विरोधी असल्याचे म्हटले आहे.
राहुल दलितांच्या घरी हनिमून आणि पिकनिकसाठी जातात. राहुलची आई त्यांना सांगते, तु परदेशी मुलीबरोबर लग्न केले तर तु नक्की पंतप्रधान होशील. राहुलने भारतीय मुलीबरोबर लग्न करावे, असे त्यांना वाटत नाही.” असे विधान रामदेव बाबा यांनी लखनौ येथील प्रचारसभेत केले. या वक्तव्यानंतर काही दलित कार्यकर्त्यांनी रामदेव यांच्या विरोधात निवडणूक आयोग व राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.