काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मोदी केवळ १५-२० जणांसाठी काम करतात आणि बाकी सर्वाकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

येथे आयोजित करण्यात आलेल्या रोड-शोदरम्यान राहुल गांधी यांचे भाषण झाले. सर्वसामान्य जनतेने मोदी यांना पंतप्रधानपदी निवडून दिले, मात्र निवडणुकीनंतर शेतकरी, दलित आणि बेरोजगार युवकांचा मोदी यांना विसर पडला, असे गांधी म्हणाले.

Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
in Gadchiroli charmoshi taluka s Villagers Oppose Land Acquisition for Iron Project BJP Faces Backlash in Lok Sabha Campaign
भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले

मोदी यांना केवळ १५-२० जणांसाठीच काम करावयाचे असल्यास त्यांनी ते करावे, मात्र तुम्ही देशातील अन्य जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष करू शकत नाही, मोदी सरकारने सापत्नभावाची भूमिका सोडून प्रत्येक भारतीयासाठी काम केले पाहिजे याचा काँग्रेस प्रयत्न करील, असेही ते म्हणाले.

राहुल गांधी यांच्यावर सोमवारी एका रोड-शोपूर्वी बूट भिरकावण्यात आला होता, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.