राहुल गांधींचे लग्न झालेले नाही. त्यामुळेच त्यांना तुमच्या मुलांची संपत्ती काढून घ्यायची आहे. तसेच काँग्रेसला तुमच्या मुलांची संपत्ती मुस्लिमांना द्यायची आहे, असं विधान केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले आहे. शनिवारी हिमाचल प्रदेशातील हमीरपू येथे एका प्रचार सभेत बोलताना त्यांनी हे विधान केलं. ठाकूर यांच्या या विधानानंतर आता देशातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. काँग्रेसनेही अनुराग ठाकूर यांना प्रत्युत्तर दिलं असून त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे.

नेमकं काय म्हणाले अनुराग ठाकूर?

हिमाचल प्रदेशातील हमीरपू येथील प्रचारसभेत बोलताना अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. “काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काँग्रेसच्या हातासह विदेशी शक्तींचे हातही दिसत आहेत, ज्यांना तुमच्या मुलांची संपत्ती मुस्लिमांना द्यायची आहे. देशाची अण्वस्त्रे नष्ट करायची आहेत. जातीवाद आणि प्रादेशिकवादाचा मुद्दा उपस्थित करून देशात फूट पाडायची आहे. असे ते म्हणाले.

kiren rijiju controversial remarks on rahul gandhi
राहुल गांधींसारखे विरोधी पक्षनेते देशाला शाप! संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांची टीका
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Ajit Pawar retirement jibe at uncle Sharad Pawar,
पिंपरी : वडिलधाऱ्यांनी वयाच्या सत्तरीनंतर मुलांकडे जबाबदारी दिली पाहिजे; अजित पवार यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा
maharashtra government taking rash decisions just to get votes
महायुती सरकारच्या निर्णयांची अंमलबजावणी कधी? काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा सवाल
supriya sule on balasaheb thorat cm post statement
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…
anil bonde controversial remark on rahul gandhi
राहुल गांधींच्‍या जिभेला चटके देण्‍याच्‍या वक्‍तव्‍यावरून काँग्रेस आक्रमक ; पोलीस आयुक्तांच्या कक्षात ठिय्या
Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
emand for an inquiry into pm narendra mondis allegations against Rahul Gandhi was rejected
अदानी-अंबानींनी टेम्पो भरून पैसे पाठवल्याचे वक्तव्य, पंतप्रधान मोंदींच्या राहुल गांधीवरील आरोपांच्या चौकशीची मागणी फेटाळली

हेही वाचा – पंतप्रधान मोदींवर टीका केल्यानंतर भाजपाच्या अल्पसंख्याक विभागाच्या माजी प्रमुखाला अटक…

“देशातील तुकडे-तुकडे टोळीने काँग्रेसला पूर्णपणे घेरले आहे. काँग्रेसची विचारधारा त्यांनी हायजॅक केली आहे. तुम्हाला काँग्रेसच्या ‘तुकडे-तुकडे’ टोळीबरोबर जायचे की ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ मानणाऱ्या नरेंद्र मोदींबरोबर जायचे हे तुम्हीच ठरवायचे आहे. तुमच्या मुलांची संपत्ती त्यांच्याकडे राहील, की मुस्लिमांकडे जाईल, हेसुद्धा तुम्हीच ठरवायचे आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

“राजीव गांधी पंतप्रधान झाले, तेव्हा ५५% संपत्ती सरकारकडे जाईल, असा कायदा होता. त्यांनी तो कायदा रद्द करून आपली संपत्ती वाचवली. मात्र, आता राहुल गांधींचे लग्न झालेले नाही. त्यामुळेच त्यांना तुमच्या मुलांची संपत्ती काढून घ्यायची आहे.”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – समोरच्या बाकावरून: मोदींनी दिली काँग्रेसला मानवंदना!…

अनुराग ठाकूर यांच्या टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर

दरम्यान, अनुराग ठाकूर यांच्या टीकेला काँग्रेसही प्रत्युत्तर दिलं आहे. अनुराग ठाकूर यांनी केलेली टीका म्हणजे आचारसंहितेचं उल्लंघन आहे, असं म्हणत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, अनुराग ठाकूर हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. आम्ही त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणीदेखील केली आहे.