मध्य प्रदेश, छत्तीसगडनंतर काँग्रेसने राजस्थानमध्येही शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा केली आहे. राजस्थान सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रूपयांपर्यंतचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे राज्यावर १८००० कोटी रूपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेवर येताच शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे कर्जमाफ करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तीन राज्यात विजय मिळवला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीत कृषी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीनंतर कमलनाथ यांनी मध्य प्रदेशात शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कृषी कर्जमाफी जाहीर केली. सत्तेत येताच काँग्रेसने कर्जमाफीची घोषणा केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan govt announces farm loan waiver for loans upto rs 2 lakh
First published on: 19-12-2018 at 20:54 IST