पीटीआय, नवी दिल्ली

दहशतवादाचा सामूहिकपणे निपटारा करणे आणि दहशतवादाच्या समर्थकांवर त्याचे उत्तरदायित्व निश्चित करणे आवश्यक आहे असे परखड मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशाच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीचे अध्यक्ष म्हणून बोलताना राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे नाव न घेता दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांवर टीका केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘एससीओ’च्या सदस्य देशांनी एकमेकांचे वैध हितसंबंध लक्षात घेऊन त्यांच्या स्वायत्तता आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे, असा भारताचा दृष्टिकोन असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्याच्या तरतुदीवर आधारित शांतता आणि सुरक्षा राखण्यावर भारताचा विश्वास असून ‘एससीओ’च्या सदस्य देशांमध्ये विश्वास आणि सहकार्याची भावना वाढीस लागण्यासाठी भारत प्रयत्न करत असल्याचे सिंह म्हणाले.