आसाममधील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी, तसेच मदत व बचावकार्यावर देखरेख ठेवण्यासाठी पुराचा तडाखा बसलेल्या जिल्ह्य़ांचा दौरा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी त्यांच्या सहकारी मंत्र्यांना दिले आहेत.

पुराचा फटका बसलेल्या लोकांना योग्य ती मदत मिळते आहे व त्यांच्या पुनर्वसनाची सोय होत आहे हे निश्चित करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या संबंधित मतदारसंघांमध्ये जावे हे निश्चित करण्यासाठी आसाम विधानसभेचे सध्या सुरू असलेले अधिवेशन बुधवारी तीन दिवसांकरिता स्थगित करण्यात आले होते. राज्यात सध्याच्या पुरामुळे तीन बळी गेले असून सुमारे १७ लाख लोकांना त्याचा तडाखा बसला आहे.