बांगलादेशातील सर्वोच्च न्यायालयाने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना दोषी ठरवलं आहे. त्यांच्यासह इतर दोन अधिकाऱ्यांचाही यात समावेश आहे. २०२४ मध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलना दरम्यान शेख हसीना यांनी सुरक्षा दलांना, राजकीय दलांना आणि त्यांच्याशी संबंधित सर्व दलांना हे आदेश दिले की आंदोलनकर्त्यांविरोधात कठोर कारवाई करताना मागेपुढे पाहू नका. एका अहवालाचा हवाला यासाठी देण्यात आला आहे. जो हिंसाचार उसळला त्यामुळे शेख हसीना यांनी माणुसकीच्या विरोधात जाऊन गुन्हा केला आहे असं बांगलादेशातील सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. शेख हसीना यांना देश सोडण्यास आंदोलनकर्त्यांनी भाग पाडलं होतं. आता त्या प्रकरणानंतर आठ महिन्यांनी या प्रकरणात सुनावणी सुरु झाली आहे.

आंदोलकांच्या वकिलांनी काय सांगितलं?

२०२४ मध्ये विद्यार्थ्यांनी बांगलादेशात आंदोलन केलं होतं. यावेळी साधारण १२ हून अधिक आंदोलकांचा मृत्यू झाला तर अनेक आंदोलक जखमी झाले. आंदोलनांनी हा आरोप केला आहे की शेख हसीना यांनी सुरक्षा दलांना आणि राजकीय सहकाऱ्यांना बळाचा वापर करा हे सांगितलं. त्यासंदर्भातले आदेश दिले होते असं आंदोलकांची बाजू मांडणाऱ्या वकिलाने न्यायालयात सांगितलं. मुख्य वकील ताजुल इस्लाम यांनी सांगितलं की ही हा सगळा कट योजनाबद्ध पद्धतीने करण्यात आला. यासाठी युक्तिवाद करताना व्हिडीओ फुटेज आणि इतर अनेक परिस्थितीजन्य पुरावे दाखवण्यात आले. हे सगळं ठरवून केलेलं दिसून येतं आहे असा दावा आंदोलकांच्या वकिलांनी केला.

शेख हसीना यांनी पलायन करण्याच्या आधीच्या दोन तासांत काय काय घडलं?

२०२४ मध्ये बांगलादेशात संचारबंदी लागू असतानाही आंदोलकांनी सकाळी ९ वाजल्यापासूनच एकत्र जमायला सुरुवात केली. तासाभरात लाखो लोक ढाक्याच्या रस्त्यांवर उतरले. विविध एजन्सींच्या उच्च स्तरीय सूत्रांनी प्रथम आलोला खुलासा केला की, सकाळी साडेदहाच्या सुमारास लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख आणि पोलीस महानिरीक्षक (IGP) यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलावण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरल्याने शेख हसीना यांनी सुरक्षा दलांवर नाराजीही व्यक्त केली. आंदोलकांविरोधात कठोर कारवाई का केली नाही? असा सवालही त्यांनी विचारला. शेख हसीना यांनी सुरक्षा दलांवर विश्वास ठेवला होता. त्यासाठीच त्यांची उच्च पदावर नियुक्त केली होती. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने अतिरिक्त पोलीस फौजफाटा मागवण्यात आला. परंतु, तरीही दिर्घकाळ ही परिस्थिती हाताळणं असह्य झाले. केवळ बळाच्या जोरावर परिस्थिती नियंत्रणात आणता येणार नाही, असे उच्च अधिकाऱ्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु शेख हसीना ते स्वीकारण्यास तयार नव्हत्या, असे प्रोथोम ऑलोच्या अहवालात म्हटले आहे.