पीटीआय, नवी दिल्ली

न्यायालयीन कामकाजासह आधुनिक प्रक्रियांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) एकत्रीकरण केल्याने नैतिक, कायदेशीर आणि व्यावहारिक प्रश्न उपस्थित होतात असे प्रतिपादन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी शनिवारी व्यक्त केले. या प्रक्रियेची कसून तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

bjp candidate selection process through lottery in maharashtra
विश्लेषण : चिठ्ठीतील ‘नशीबवानां’कडे लक्ष; भाजपची उमेदवार निवडीची पद्धत राज्यात किती फायदेशीर? ती वादग्रस्त का ठरतेय?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
ujjwal nikam on akshay shinde encounter
“या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी नक्कीच होईल, कारण…”; अक्षय शिंदेच्या मृत्यूप्रकरणी उज्वल निकम यांची प्रतिक्रिया!
Dermatologists approached high court to stop dentists from performing skin related surgeries
सौंदर्याशी संबंधित शस्त्रक्रियांवरून दंतरोग तज्ज्ञ आणि त्वचा रोग तज्ज्ञांमध्ये का जुंपली? हा मुद्दा वादाचा का ठरतोय?
Reservation and privilege should also be sub categorized
आरक्षण आणि सत्तालाभाचेही उपवर्गीकरण व्हावे!
chatusutra article on constitution of india marathi news
चतु:सूत्र : जगण्याचा अधिकार!
Dentists are challenged to perform cosmetic and hair transplant surgery Mumbai print news
दंतचिकित्सकांना सौंदर्य आणि केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याला आव्हान
under Section 294 of IPC encouraging women in dance bar to dance is not offence High Court
डान्सबारमधील अश्लील नृत्यास प्रोत्साहन गुन्हा नाही, एकाविरोधातील गुन्हा रद्द करताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण

भारत आणि सिंगापूरच्या सर्वोच्च न्यायालयांच्या दोन दिवसीय परिषदेच्या वेळी सरन्यायाधीश बोलत होते. या परिषदेत तंत्रज्ञान आणि संवाद या मुद्द्यांवर उहापोह करण्यात येत आहे. न्या. चंद्रचूड म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता ही कल्पकतेची पुढील आघाडी आहे. न्यायालयीन कामकाजामध्ये त्याचा वापर ही संधी आणि आव्हान हे दोन्ही आहे. त्याच्या सूक्ष्म विवेचनाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, ‘‘एकीकडे ‘एआय’मुळे अभूतपूर्व संधी निर्माण झाल्या आहेत; त्याचवेळी त्यामुळे अनेक क्लिष्ट आव्हाने निर्माण झाली आहेत. विशेषत: नीतिमत्ता, दायित्व आणि पक्षपातीपणा याबाबतीत हे प्रश्न उपस्थित होता. या आव्हानांचा सामना करण्यासाठी जगभरात सर्व भौगोलिक आणि संस्थात्मक सीमा ओलांडून एकत्रित प्रयत्नांची गरज आहे’’.सिंगापूरच्या सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सुंदरेश मेनन यावेळी उपस्थित होते. त्यांच्याबरोबर अन्य अनेक न्यायाधीश आणि तज्ज्ञांनीही या परिषदेला हजेरी लावली आहे.