नवी दिल्ली : हा शेतकऱ्यांच्या संघर्षाचा आणि सत्याचा विजय आहे. तसाच तो ६२ कोटी शेतकऱ्यांच्या इच्छाशक्तीचा आणि या लढ्यात शहीद झालेल्या सातशेहून अधिक शेतकऱ्यांच्या बलिदानाचाही विजय आहे. शेतकऱ्यांच्या लढ्यातून भाजप सरकार भविष्यासाठी काही धडे घेईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार यापुढे अहंकार, हट्टीपणा सोडून शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यावर लक्ष केंद्रीत करेल. त्याचबरोबर किमान आधारभूत किंमत निश्चिात करेल. तसेच यापुढे असे कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी राज्य सरकारे, शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांशी चर्चा करेल, अशी अपेक्षाही सोनिया यांनी व्यक्त केली.

देशाच्या अन्नदात्यांनी सत्याग्रहाद्वारे अहंकाराला नमवले आहे. त्यामुळे तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा मोदी सरकारचा निर्णय हा अन्यायाविरोधातील विजय आहे. आंदोलनात शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्यांचा हा पराभव आहे.   राहुल गांधी, खासदार, काँग्रेस नेते 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Struggle of the peasants the victory of truth congress acting president sonia gandhi akp
First published on: 20-11-2021 at 00:01 IST