राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात देशातील सर्व व्यक्तिमत्त्वांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले. यावेळी वाराणसीचे १२६ वर्षीय स्वामी शिवानंद पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांनी असे काम केले की संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा गजर झाला. राष्ट्रपती भवनात पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी स्वामी शिवानंद यांनी तीनदा डोके टेकले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

वाराणसीचे १२६ वर्षीय स्वामी शिवानंद यांना भारतीय जीवनपद्धतीत आणि योगाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोमवारी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वामी शिवानंद पोहोचले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नमस्कार केला. स्वामी शिवानंद यांची ही कृती पाहून पंतप्रधान मोदींनीही नतमस्तक होऊन नमस्कार केला. यानंतर स्वामी शिवानंद यांनी रेड कार्पेट आणि स्टेजजवळ दोनदा डोके टेकून रामनाथ कोविंद यांनाही नमस्कार केला.

Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
What Ashish Shelar Said About Uddhav Thackeray?
उद्धव ठाकरे हे मोदी-शाह यांच्या संपर्कात आहेत का? आशिष शेलार म्हणाले..
Draupadi murmu
भाजपाकडून पुन्हा राष्ट्रपतींचा अवमान? सोशल मीडियावर ‘तो’ फोटो व्हायरल; विरोधकांच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर!
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित

यानंतर राष्ट्रपती कोविंद आपल्या खुर्चीवरून उठले आणि त्यांनी स्वामी शिवानंद यांना उभे केले आणि त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले. राष्ट्रपती कोविंद यांनीही स्वामी शिवानंद यांच्यासोबत हसत संवाद साधला. स्वामी शिवानंद हे वाराणसीच्या कबीर नगर भागात राहतात. वयाच्या १२६ व्या वर्षीही ते खूप निरोगी आहेत.

कोण आहेत स्वामी शिवानंद?

स्वामी शिवानंद यांचा जन्म ८ ऑगस्ट १८९६ रोजी बंगालच्या श्रीहट्टी जिल्ह्यात झाला. त्यांच्या आई-वडिलांचे उपासमारीने निधन झाले होते, तेव्हापासून शिवानंद यांनी अर्ध्या पोटी जेवण्याचे व्रत घेतले, ते आजपर्यंत पाळत आहेत. काही काळानंतर त्यांनी बंगालमधून काशी गाठली आणि येथे गुरु ओंकारानंद यांच्याकडून शिक्षण घेतले. १९२५ मध्ये, ओंकारानंद यांच्या आदेशानुसार, ते जगाच्या दौऱ्यावर गेले. त्यांनी सुमारे ३४ वर्षे देश-विदेशात प्रवास केला.

आश्रमात दीक्षा घेतल्यानंतर १९७७ मध्ये ते वृंदावनला गेले. दोन वर्षे वृंदावनात राहिल्यानंतर ते १९७९ मध्ये वाराणसीला आले. तेव्हापासून ते इथेच राहत आहेत. स्वामी शिवानंद अनेक देश फिरले आहेत. विमानतळावरही त्यांना एवढ्या वयात कोणाचाही आधार न घेता फिरताना पाहून लोक आश्चर्यचकित होतात.

वाराणसीमध्ये काही वर्षे राहिल्यानंतर त्यांनी लोकांना योग आणि निरोगी दिनचर्यासाठी प्रेरित करण्यास सुरुवात केली. काशीबद्दल ते म्हणतात की ती पवित्र भूमी आहे तशी तपोभूमी आहे. येथे भगवान शंकर स्वतः वास करतात, त्यामुळे त्यांना येथे राहण्यास आवडते. स्वामी शिवानंद यांना योग आणि धर्माचे खूप सखोल ज्ञान आहे.