राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादावर भाष्य केलं. यावेळी ‘बच्चू कडू हे माझ्या एका फोनवर गुवाहाटीला गेले होते’, अशी माहिती दिली. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याआधी भाजपाने बंडखोरीशी पक्षाचा काही संबध नसल्याचे दावे केल होते. दरम्यान ठाकरे गटही यानंतर आक्रमक झाला असून प्रतिक्रिया देत आहे. ठाकरे गटातील नेते अनिल देसाई यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं.

राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट आणि आमदारांची अपात्रता आदी मुद्दय़ांवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी होणार आहे. त्याआधी अनिल देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवरील टीका तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली.

samarjit singh
कर्ता पुरुषच गेला,आता आम्हाला आधार कुणाचा? लोकरेंच्या पत्नी, मातेच्या आक्रोशाने समरजितसिंह घाटगेंसह नातेवाईक गलबलले
amit shah interview
“पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज पडणार नाही” म्हणणाऱ्या अरविंद केजरीवालांवर अमित शाहांची टीका; म्हणाले…
eknath shinde
नाशिक दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांकडील नऊ मोठ्या बॅगांमध्ये काय होतं? विरोधकांच्या आरोपांवर शिंदे गटाचं उत्तर, म्हणाले…
Nana patole on uddhav thackeray
“…तर उद्धव ठाकरेंसाठी मदतीला धावणारा मी पहिला व्यक्ती असेन”; मोदींच्या विधानावर नाना पटोले म्हणाले, “या जगात…”
sharad pawar replied to narendra modi
नरेंद्र मोदींच्या ‘अतृप्त आत्मा’ टीकेवर शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांचे म्हणणं खरं आहे, पण…”
ajit pawar narendra modi
नरेंद्र मोदींच्या शरद पवारांवरील ‘अतृप्त आत्मा’ टीकेवर अजित पवार म्हणाले, “मी पुढच्या सभेत मोदींनाच…”
Devendra Fadnavis Answer to Uddhav Thackeray
देवेंद्र फडणवीसांचा टोला, “उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका करणं म्हणजे सूर्याकडे थोबाड करुन थुंकण्याचा प्रकार”
dhananjay munde criticized sharad pawar
सुनेत्रा पवारांबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून धनंजय मुंडेंची शरद पवारांवर टीका; म्हणाले, “कुणी आपल्या सुनेला परकं म्हणत असेल, तर…”

“बच्चू कडू माझ्या फोननंतर गुवाहाटीला गेले”; देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यावर अदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांचं विधान…”

आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपा नेते त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. उद्धव ठाकरे यांनी चालवलेले सरकार आणि आदित्य ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिका याचं वर्णन अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्र असंच करता येईल अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. यावर बोलताना अनिल देसाई म्हणाले की, स्वत: कुठेतरी कथानक लिहित आहेत. खोटं चित्र उभं करण्याचा प्रयत्न होत आहे. कोण राजा, कोण राजपुत्र, कोणी जनतेत जाऊन काम केलं हे सर्वांना दिसत आहे. कोण विलासी आहे याचंही दर्शन जनतेला घडत आहे.

“त्यांना सर्व स्वातंत्र्य असून कशासाठीही बांधील नाहीत. महागाई, बेरोजगारी याकडे यांचं लक्ष नाही. जनतेने जर उद्या हे प्रश्न उपस्थित केले तर त्यांनाही ते विलासी म्हणतीत,” अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.

“…तर पेंग्विननेही डोक्यावर हात मारला असता,” ‘अहंकारी राजा, विलासी राजपूत्र’ म्हणत आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर टीका

बच्चू कडूंना फोन केल्याच्या फडणवीसांच्या विधानासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले “अर्थात, म्हणजे कशा प्रकारे, काय रितीने सुरु होतं हे कळतंय ना. कोणाचे आदेश पाळले जात होते, कोणाचा शब्द अंतिम असतो, कोणाच्या इशाऱ्यावर कोण चालतं हे त्यांच्याच शब्दात महाराष्ट्राच्या जनतेसमोर येत आहे”.

“मुख्यमंत्र्यांनी सभागृहात फडणवीस कसे कलाकार आहेत याचं वर्णन केलं होतं. लोकांनाही हे कळलं आहे. सुप्रीम कोर्ट या सगळ्याची दखल घेईल आणि त्याप्रमाणे न्याय होईल अशी आशा आहे,” असंही ते म्हणाले.

पाहा व्हिडीओ –

नेमकं काय म्हणाले होते फडणवीस?

“बच्चू कडू हे माझ्या एका फोनकॉलवर गुवाहाटीला गेले होते. मी त्यांना फोन करून सांगितलं होतं, की आम्हाला सरकार बनवायचे आहे आणि तुमची साथ हवी आहे. त्यामुळे बच्चू कडूंनी कोणता आर्थिक व्यवहार केला, हे म्हणणं चुकीचं आहे. इतरांचं मला माहिती नाही. मात्र, बच्चू कडूंवर अशा प्रकारचे आरोप लावणं चुकीचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे जे लोक गुवाहाटीला गेले, ते पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेऊन गेले होते”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.