भारताने बांगलादेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे आश्वासन दिले, तर बांगलादेशातील निम्मे लोक त्या देशातून बाहेर पडतील, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी रविवारी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुधारित नागरिकत्व कायदा कशा प्रकारे भारताच्या १३० कोटी लोकांच्या विरोधात आहे हे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सिद्ध करावे, असे आव्हानही रेड्डी यांनी येथील संत रविदास जयंती समारंभात बोलताना दिले.

‘भारताने बांगलादेशींना नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव दिला, तर निम्मा बांगलादेश रिकामा होईल. भारतीय नागरिकत्व मिळणार असेल तर त्या देशातील निम्मी लोकसंख्या भारतात येईल. त्यांची जबाबदारी कोण घेईल? केसीआर की राहुल गांधी?’, असा प्रश्न रेड्डी यांनी विचारला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Then half of bangladesh will be empty union home minister kishan reddy abn
First published on: 10-02-2020 at 01:14 IST