जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे (जेएनयू) माजी विद्यार्थी आणि सध्या मोदी सरकारमध्ये महत्वाचे मंत्री असलेले एस. जयशंकर आणि निर्मला सीतारामन यांनी जेएनयूतील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. दरम्यान, जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेने हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) विद्यार्थ्यांनी घडवून आणल्याचा आरोप केला आहे. Have seen pictures of what is happening in #JNU. Condemn the violence unequivocally. This is completely against the tradition and culture of the university. — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) January 5, 2020 परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी या हल्ल्यावर पहिल्यांदा ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटले, जेएनयूतील हिंसाचाराची छायाचित्रे मी पाहिली. हे अत्यंत वेदनादायी असून याचा मी निषेध करतो. हा प्रकार विद्यापीठाची परंपरा आणि संस्कृतीच्या पूर्णपणे विरोधी आहे. Horrifying images from JNU — the place I know & remember was one for fierce debates & opinions but never violence. I unequivocally condemn the events of today. This govt, regardless of what has been said the past few weeks, wants universities to be safe spaces for all students. — Nirmala Sitharaman (@nsitharaman) January 5, 2020 जयशंकर यांच्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी देखील या घटनेवर ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, जेएनयूतील छायाचित्रं भयानक आहेत. मला आठवतय की जेएनयू पूर्वी एक अशी जागा होती जिथे वाद-विवाद आणि आपली मत मांडली जायची मात्र, कधीही हिंसाचाराच्या घटना घडल्या नाहीत. त्यामुळे मी स्पष्टपणे या घटनेचा निषेध नोंदवते. आमच्या सरकारसाठी विद्यापीठं ही सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित ठिकाणं हवीत. #JNU has always been a centre of lively & vibrant debate, discussion & co-existence of different viewpoints. What has happened today is extremely sad & tragic. I strongly & unequivocally condemn the violence on campus. This is totally unacceptable. — Amitabh Kant (@amitabhk87) January 5, 2020 आणखी वाचा - JNU Violence: पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या डोक्यात लाथा मारल्या – प्रियंका गांधी त्याचबरोबर, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी देखील जेएनयूतील हल्ल्याचा आणि हिंसाचाराचा ट्विटच्या माध्यमातून निषेध नोंदवला आहे.