पाच राज्यांचे निवडणूक निकाल लागले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आली आहे. मध्य प्रदेशमध्ये तर भाजपाने रेकॉर्ड ब्रेक मतं मिळवली आहेत. आता या सगळ्या निकालांवरुन २०२४ ची लोकसभा निवडणूकही भाजपाच जिंकणार असे अंदाजही व्यक्त होत आहेत तसंच भाजपा नेत्यांनीही तसा दावा केला आहे. सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर जोरदार टीका करण्यात आली आहे. तसंच मोदींची गॅरंटी या शब्दाचाही समाचार घेण्यात आला आहे.

काय म्हटलं आहे सामना अग्रलेखात?

पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. २०२४ च्या लोकसभेची सेमी फायनल भाजपाने जिंकली आहे. मात्र सेमी फायनल जिंकणारा फायनल जिंकतोच असे नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फायनल जिंकण्याची गॅरंटी दिली आहे. जो तो आपल्या पद्धतीने पाचही राज्यांमधल्या जय-पराजयाचं विश्लेषण करत आहे. मिझोरम विधानसभा निवडणुकीचाही निकाल लागला आहे. तिथे स्थानिक पक्षांना यश मिळालं आहे. देशाचे किंवा जगाचे नेते असलेले पंतप्रधान मोदी तेलंगणाप्रमाणे मिझोरामही जिंकू शकलेले नाही. देशात सर्वत्र मोदी मॅजिक चाल नाही. अनेक राज्यांतील लोक सुज्ञ आणि विचारी आहेत. त्यामुळेच देशात लोकशाही पूर्णपणे खतम करता आलेली नाही. भारतीय जनता पक्षाने मोदींच्या गॅरंटीवर शिक्कामोर्तब केले तर राहुल गांधींच्या मोहब्बत की दुकानवर शुकशुकाट झाल्याचा दावाही भाजपाने केला.

bjp candidate selection process through lottery in maharashtra
विश्लेषण : चिठ्ठीतील ‘नशीबवानां’कडे लक्ष; भाजपची उमेदवार निवडीची पद्धत राज्यात किती फायदेशीर? ती वादग्रस्त का ठरतेय?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
possibility of a rift in the Mahavikas Aghadi over the Gondia Assembly Constituency
पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद अन् दोघेही बाशिंग बांधून तयार, पण सुमंगल कोणाचे? गोंदियावरून आघाडीत तिढा!
Tisari Aghadi, Bachchu Kadu, Sambhaji Raje,
तिसऱ्या आघाडीचा घाट केवळ अहंभावामुळे?
Jayant Patil
Jayant Patil : “एका मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली”, जयंत पाटलांचं येवल्यात विधान; इच्छा व्यक्त करणारा नेता कोण? चर्चांना उधाण
Efforts by BJP and Shiv Sena Shinde group to make Ajit Pawar group leave the Grand Alliance and contest the assembly elections independently
अजित पवारांच्या एक्झिटसाठी चक्रव्यूह? भाजप-शिंदे गटाकडून आक्रमक रणनीती
one nation one election, modi government,
विश्लेषण : एक देश, एक निवडणुकीसाठी आव्हाने अधिक! आर्थिक गणितांपेक्षा राजकीय गणितेच अधिक?
cm eknath shinde led mahayuti alliance face reservation issue ahead of assembly elections
मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी सर्व समाजांना चुचकारताना मुख्यमंत्र्यांची कसोटी, निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

हे गॅरंटी प्रकरण काय आहे?

हे गॅरंटी प्रकरण काय आहे? मोदींनी २०१४ पासून अनेक ‘गॅरंट्या’ दिल्या होत्या. प्रत्येक निवडणुकीत त्यांचे गॅरंटी कार्ड वाढत असते. परदेशातला काळा पैसा परत आणण्याची गॅरंटी होती त्याचं काय झालं? भ्रष्टाचाराचं समू उच्चाटन करुन भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची गॅरंटी होती त्याचं काय झालं? काही भ्रष्टाचारी भाजपाने पळवून लावले आणि उरलेले होते त्यांना पक्षात घेऊन मंत्री करण्यात आले.भ्रष्टाचाऱ्यांना भाजपात आणून शुद्ध करायचे ही नवी गॅरंटी आहे. काश्मीरसह देशातला दहशतवाद संपवण्याची गॅरंटी होती. मोदींच्या डोळ्यासमोर पुलवामा, पठाणकोट, उरी घडे. काश्मीरमध्ये रोज जवानांच्या हत्या सुरू आहेत. मणिपुरातील दहशतवादाने कहर केला आहे. काय झाले दहशतवाद संपवण्याच्या गॅरंटीचे?

पेट्रोल ४० रुपये लिटर करण्याची गॅरंटी होती. वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याची गॅरंटी होती. शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करण्याची गॅरंटी होती. डॉलरच्या तुलनेत रुपया ३०-३५ रुपयांवर आणण्याची गॅरंटी होती. काय झाले तुमच्या गॅरंटीचे? अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याची गॅरंटी होती. मराठा आणि धनगरांना आरक्षण देण्याची गॅरंटी होती. महागाई कमी करुन जनतेला अच्छे दिन दाखवण्याची गॅरंटी होती. या सर्व ‘गॅरेंट्या’ मोदींनीच दिल्या होत्या. त्यातली एकही गॅरंटी पूर्ण झाल्याचं दिसत नाही. तरीही तीन राज्यांत भाजपाचा विजय होतो हीच लोकशाहीची गंमत आहे. कोणतीही गॅरंटी पूर्ण न करता मोदींना विजय मिळतो आणि त्याचा उत्सव साजरा होतो. त्यामुळे या विजयाचे बाप कोण? असा प्रश्न पडतो.