पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पराभव मान्य केला असून काँग्रेसला विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आम्ही जनतेचा जो कौल आहे त्याचा नम्रतेने स्वीकार करतो. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या जनतेने आम्हाला त्यांची सेवा करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो असे मोदींनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या राज्यातील भाजपा सरकारांनी जनतेच्या कल्याणासाठी अथक मेहनत घेतली असे मोदी यांनी म्हटले आहे. मोदींनी तेलंगणमधील विजयासाठी केसीआर आणि मिझो नॅशनल फ्रंटलाही विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपा कार्यकर्त्यांच्या कुटुंबाने दिवस-रात्र मेहनत केली. मी त्यांच्या मेहनतीला सलाम करतो. जय आणि पराजय आणि आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. जनतेची सेवा करण्याच आमचा संकल्प आहे. यापुढे आम्ही भारताच्या विकासासाठी अधिक मेहनत करु असे मोदी यांनी म्हटले आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We accept peoples mandate narendra modi
First published on: 11-12-2018 at 22:07 IST