शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबरोबरच नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी मोदी केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात झिरो बजेट शेतीवर जोर दिला होता. उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना फायदा होईल, अशी भूमिका सरकारने घेतली. मात्र, केंद्र सरकारने घेतलेल्या झिरो बजेट शेतीच्या मुद्यावर राष्ट्रीय कृषि विज्ञान अकादमीने (नास) सरकारला फटकारले आहे. “झिरो बजेट शेती म्हणजे अव्यवहार्य बोगस तंत्रज्ञान असून, त्यातून शेतकरी अथवा ग्राहकांना कोणताही गुणात्मक लाभ होणार नाही”, असा दावा अकादमीचे अध्यक्ष पंजाब सिंग यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलांवर संयुक्त राष्ट्र संघाचे नवी दिल्लीत अधिवेशन सुरू आहे. सोमवारी या चर्चासत्रात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवामान बदलांना रोखण्यासाठी विविध उपाय सुचवले. यात प्लॅस्टिक टाळण्याबरोबर पडीक जमीन कसण्याचा सल्ला मोदींनी दिला. यावेळी भारत झिरो बजेट नैसर्गिक शेतीवर भर देत असल्याचे म्हटले आहे. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पुन्हा मूळ शेतीकडे जाण्याची गरज असल्याचे सांगत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी झिरो बजेट शेतीवर भर दिला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zero budget natural farming zbnf it as an unproven technology says naas bmh
First published on: 10-09-2019 at 14:04 IST