एअर इंडियाची मालकी हस्तांतरण प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. आज टाटा समूह आणि केंद्र सरकार यांच्यात झालेल्या शेवटच्या प्रक्रिया फेरीनंतर आता एअर इंडियावर पूर्णपणे टाटांची मालकी प्रस्थापित झाली आहे. एअर इंडिया २७ जानेवारी रोजी ६९ वर्षांनंतर संस्थापक टाटा समूहाकडे परतली आहे. आयर्लंडमधील भाडेकरूंकडून अनिवार्य मंजुरी (एनओसी) वगळता मालकीच्या हस्तांतरणासाठी सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत. टाटा समूहाने गुरुवारी मुंबईहून चालवल्या जाणाऱ्या चार फ्लाइट्सवर ‘उत्तम जेवण सेवा’ सुरू करून एअर इंडियामध्ये पहिला प्रवेश केला. याशिवाय, मालकी मिळाल्यानंतर, एअर इंडियामध्ये आणखी बरेच बदल केले जाऊ शकतात. ज्यामध्ये प्रवाशांच्या थेट संपर्कात येणाऱ्या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जाऊ शकतात अशी माहिती अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एअर इंडिया टाटांकडे सोपवण्याचा औपचारिक अर्थ काय? आता काय होणार?

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained air india handover new air india flight upgraded meals rattan tata special voice message abn
First published on: 27-01-2022 at 20:29 IST