भारतीय संस्कृतीत सोळा शृंगारला विशेष महत्त्व आहे. शास्त्रातही सौभाग्यासाठी सोळा शृंगार आवश्यक असल्याचे सांगितले आहे, हिंदू धर्मात स्त्रियांसाठी सोळा अलंकार सांगितले आहेत. यामुळे महिलांचे सौंदर्य वाढते. हिंदू धर्मात विवाहित महिलांच्या मेकअपला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात स्त्रियांच्या सोळा अलंकारांची चर्चा आहे, जी लग्नानंतर महिला करतात. मंगळसूत्र, हिरवा चुडा, कपाळावर टिकली, पायात पैंजण, आणि जोडवी हे अलंकार स्त्रियांच्या विवाहित असल्याचा पुरावा मानला जातो. एक लग्न झालेली स्त्री गळ्यात मंगळसूत्र, केसांच्या भांगेत शेंदूर, हातात बांगड्या हे सर्व घालतेच. लग्नानंतर भारतीय स्त्रिया नक्कीच त्यांच्या पायात पैंजण आणि पायाच्या बोटामध्ये चांदीची जोडवी ही घालतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, महिलांच्या पायात पैंजण आणि जोडवी घालण्यामागे केवळ धार्मिकच नाही तर वैज्ञानिक बाबीही आहेत.

पैंजण घालण्याचे धार्मिक महत्त्व

पैंजण घालणे हिंदू धर्मात खूप शुभ मानले जाते. दुसरीकडे, ज्योतिषशास्त्रानुसार, चांदीच्या धातूपासून बनविलेले पैंजण चंद्राशी संबंधित आहेत. हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की, चांदीची उत्पत्ती ही भगवान शंकराची देणगी आहे. त्याच्या वास्तुशास्त्रात देखील पैंजणला सकारात्मकतेशी जोडले गेले आहे. यानुसार पैंजणच्या घुंगरूमधून निघणारा आवाज सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतो, असे मानले जाते.

uma badve s swalekhan App
‘स्वलेखन’ ॲपद्वारे दृष्टीहिनांना डिजिटल युगाचे दार खुले करणाऱ्या उमा बडवे
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Loksatta Chatura Article on health of working women
तू तुझं आरोग्य सांभाळून राहा…
transplant artificial limb for injured cow in mumbai
जखमी गायीला कृत्रिम पाय; प्रत्यारोपणाची पहिली आणि यशस्वी शस्त्रक्रिया
Dermatologists approached high court to stop dentists from performing skin related surgeries
सौंदर्याशी संबंधित शस्त्रक्रियांवरून दंतरोग तज्ज्ञ आणि त्वचा रोग तज्ज्ञांमध्ये का जुंपली? हा मुद्दा वादाचा का ठरतोय?
Is surgery necessary for the problem of uterovaginal prolapse
स्त्री आरोग्य : ‘अंग’ बाहेर येणं समस्येसाठी शस्त्रक्रिया करावीच लागते का?
Prajwal Revanna Rape Victime
Prajwal Revanna Chargesheet: ‘बलात्कार करताना पीडितेला हसायला सांगायचा’, प्रज्ज्वल रेवण्णाच्या विकृतीचा कळस
Miscarriages Frequently
स्त्री आरोग्य : वारंवार गर्भपात होतोय का?

(हे ही वाचा: Hindu Rituals : लग्नात नवरदेव घोड्यावर नव्हे, तर घोडीवर बसतो; पण का अन् तेही पांढरीच घोडी का? जाणून घ्या कारण …)

पैंजण घालण्याचे वैज्ञानिक फायदे

अस म्हटलं जातं की, चांदी रक्ताभिसरणासाठी उपयुक्त आहे. अशावेळी चांदीचे पैंजण घातल्याने पायांचे दुखणे कमी होते आणि हाडे मजबूत होतात. पैंजण घातल्याने पायात सूज येत नाही. असेही म्हटले जाते की, महिलांच्या पायात जमा होणारी चरबी देखील या पैंजणांमुळे नियंत्रणात राहते. 

महिला जोडवी का घालतात?

स्त्रीच्या शृंगारातील महत्त्वाचे भाग म्हणजे जोडवी. लग्नानंतर भारतीय स्त्रिया त्यांच्या पायात चांदीची जोडवी परिधान करतात. मंगळसूत्र, कुंकू व्यतिरिक्त जोडवी देखील सुहागचे चिन्ह मानले जाते. जोडवी स्त्रियांच्या १६ शृंगारापैकी एक आहे, असे मानले जाते की, जोडवी परिधान केल्याने सूर्य आणि चंद्राची कृपा देखील राहते. धर्मग्रंथानुसार, विवाहित महिलांनी कोणत्याही पायाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूच्या दुसर्‍या बोटामध्ये जोडवी परिधान करावी. धर्मग्रंथानुसार, विवाहित स्त्रियांनी जोडवी परिधान करावे, असे म्हणतात. चांदीचे पैंजण आणि जोडवी लक्ष्मीचे वाहक आहेत, असं म्हटलं जाते.

(हे ही वाचा: भारतात चंद्राला ‘चंदा मामा’ का म्हणतात? काका, भाऊ, बाबा असं का म्हणत नाही, माहितेय? जाणून घ्या रहस्य )

जोडवी परिधान करण्याचे फायदे काय?

धार्मिक श्रद्धा व्यतिरिक्त जोडवी परिधान करण्याची अनेक वैज्ञानिक कारणे देखील नोंदवली गेली आहेत. असे मानले जाते की, जोडवी परिधान केल्याने मासिक पाळी व्यवस्थित राहते आणि फर्टिलिटी देखील वाढते. 

तज्ज्ञांच्या मते, लग्नानंतर घातलेले प्रत्येक दागिने महिलांच्या आरोग्याशी संबंधित असतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बोटे वेगवेगळ्या प्रकारचे मज्जातंतू आणि एक्यूप्रेशर पॉईंट्स असतात जे जोडवी परिधान करून सक्रिय होतात, ज्यामुळे आरोग्यास कुठेतरी फायदा होतो.

जोडवीमुळे एक विशिष्ट रक्तवाहिनी व दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीत होतो.

चांदीची जोडवी शिरा आयोजित करते, ज्यामुळे शरीरातील चुंबकीय क्षेत्र सुधारते. यामुळे, शरीराची नैसर्गिक कार्ये योग्यरित्या कार्य करतात आणि हार्मोनल आरोग्य देखील योग्य राहते.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)