२२ जानेवारी २०२४ या दिवशी प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी असं म्हटलं आहे की इंडिया आघाडीची सत्ता आल्यानंतर आम्ही राम मंदिराचं शुद्धीकरण करणार. यामागचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

“नरेंद्र मोदी यांनी नगरमध्ये भाषण केलं. ते म्हणाले की काँग्रेसची सत्ता आली तर ते मी आणलेल्या योजना काढून घेतील. राम मंदिरही त्यात आलं असं ते म्हणाले. गहू आणि तांदूळ देतात ती योजनाही आमचीच आहे. आम्ही काही त्या योजना बंद करणार नाही. तसंच गरीबांना आम्ही प्लॅस्टिकचे तांदूळ देणार नाही. योग्य प्रमाणात अन्न, धान्य आणि साखर देणार. ” असा टोला नाना पटोलेंनी लगावला आणि राम मंदिराबाबत भाष्य केलं.

CM Eknath Shinde, Eknath Shinde visit Buldhana,
“आई भवानी आमच्या सावत्र भावांना सुबुद्धी….”, दर्शनाला गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना डिवचले
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
BJP Navi Mumbai, Navi Mumbai Eknath Shinde,
नवी मुंबईत शिंदे समर्थकांच्या अभियानामुळे भाजपमध्ये अस्वस्थता
Mahalakshmi Murder Case
Mahalakshmi Murder Case : महालक्ष्मीची हत्या का केली? आरोपीने आत्महत्या करण्यापूर्वी काय सांगितलं होतं? मुक्तीरंजन रायच्या आईचा धक्कादायक खुलासा
Akshays parents went to Ambernath Municipality for burial permission their application was not accepted
अक्षय शिंदेचे प्रकरण सत्ताधारी पुरस्कृत, मृत अक्षयच्या वकिलांचा आरोप
Woman In Bengaluru Killed Body Chopped
Bengaluru Murder : महालक्ष्मी हत्या प्रकरणातील संशयित आरोपीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये गुन्ह्याची कबुली
Tirupati Balaji Prasad
Tirupati Prasad ladu : तिरुपती प्रसाद लाडू वादानंतर मंदिराच्या शुद्धीकरणासाठी महाशांती होम, प्रकरणाची चौकशी विशेष तपास समितीकडे
Thane, Husband wife suicide, Nadgaon area,
ठाणे : पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

हे पण वाचा- राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेनंतर काय होणार? बांधकाम पूर्ण होण्याबाबत अध्यक्षांनी दिली माहिती

राम मंदिराचं शुद्धीकरण करणार

“आम्ही सत्तेत आल्यानंतर राम मंदिराचं शुद्धीकरण करणार आहोत. कारण आमच्या सनातन धर्माच्या चार शंकराचार्यांनी या विधीला विरोध केला होता. त्यामुळे चार शंकराचार्यांना आम्ही बोलवू आणि राम मंदिराचं शुद्धीकरण करुन घेऊ. तसंच त्या मंदिरात आम्ही राम दरबार स्थापन करु कारण आत्ता त्या मंदिरात राम दरबार नाही. मूळ जी मूर्ती बाजूला सारण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही रामलल्लांचा दरबार मंदिरात सजवू. तसंच शंकराचार्यांच्या हस्ते आम्ही मंदिराचं शुद्धीकरण करु, कारण त्यांचंच हे म्हणणं आहे की जो विधी झाला तो धर्माला धरुन झाला नाही. आम्ही सुधारणा करु. धर्माच्या आधारावर सुधारणा करु, अधर्माच्या नाही. नरेंद्र मोदींनी केलं ते अधर्माच्या आधारावर सगळं केलं असाही टोला नाना पटोलेंनी लगावला.

शरद पवारांच्या विलीनकरणाच्या वक्तव्याबाबत काय म्हणाले नाना ?

“राहुल गांधी काही दिवसांपूर्वी पुण्यात आले होते. त्यावेळीच त्यांनी मला सांगितलं की देशभरात भाजपाच्या हुकूमशाही प्रवृत्तीचा परिणाम जाणवतो आहे. त्यामुळे काँग्रेस हाच पर्याय आहे असं प्रादेशिक पक्षांना वाटतं आहे. याच आधारावर शरद पवारांनी विलीनीकरणाचं वक्तव्य केलं असेल.” असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

आता नाना पटोले यांच्या वक्तव्यावर भाजपाकडून काय प्रतिक्रिया दिली जाते ते पाहणं महत्त्वाचं आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी शंकराचार्यांनी मंदिर अपूर्ण असल्याच्या कारणावरुन मंदिराची प्राणप्रतिष्ठा पुढे ढकलावी असं आवाहन केलं होतं. मात्र २२ जानेवारीलाच हा सोहळा पार पडला. आता नाना पटोलेंनी सत्तेत आल्यानंतर राम मंदिराचं शुद्धीकरण केलं जाईल असं म्हटलं आहे.