काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये शुक्रवारी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात पाच न्याय आणि २५ गॅरंटी देण्यात आल्या आहेत. यामध्ये युवा, रोजगार, मजूर, महिलांना १ लाखांची मदत, शिक्षण, शेतकऱ्यांना एमएसपीची हमी यासह ३० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. मात्र भाजपाकडून काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करण्यात आली. यामध्ये न्यूयॉर्क आणि थायलंड देशातील फोटो छापण्यात आले आहेत, यावरून काँग्रेस किती गंभीर आहे, हे दिसून येते, अशी प्रतिक्रिया भाजपाचे नेते सुधांशू त्रिवेदी यांनी दिली.

सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, “मध्यंतरी काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या प्रमुख म्हणाल्या की, त्यांचे सोशल मीडिया कोण हाताळते? हे त्यांना माहीत नाही. पण पक्षाचा जाहीरनामा कोण तयार करते, हे तरी पक्षाला माहीत असावे ना. जाहीरनाम्यात पर्यावरण विभागात जे फोटो छापले गेले आहेत, ते राहुल गांधींच्या आवडत्या देशाचे आहे. थायलंड हा देश राहुल गांधींचा आवडता देश आहे.”

wardha lok sabha seat, devendra fadnavis, not attend, campaign rally , discussion started, bjp, less crowd, sharad pawar, rally, marathi news, maharashtra politics,
शरद पवारांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांच्या फसलेल्या रॅलीची गावभर चर्चा; मात्र, भाजपा नेते म्हणतात…
prashant kishor on bjp in loksabha election 2024
Video: २०२४च्या निवडणुकीत भाजपाचं काय होणार? प्रशांत किशोर यांनी मांडलं गणित; म्हणाले, “यावेळी पहिल्यांदाच…”
rahul gandhi sanjay nirupam
“काँग्रेसने त्यांची उरलीसुरली ऊर्जा…”, संजय निरुपमांचा घरचा आहेर; म्हणाले, “माझ्यावर स्टेशनरी खर्च करू नका, मी उद्या…”
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

३० लाख युवकांना नोकरी, महिलांना वर्षाला १ लाख ते शेतीमालाला हमीभाव; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा

“काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, काँग्रेसला जेव्हा स्वातंत्र्यानंतर सत्ता मिळाली होती, तेव्हा देशात सुईचेही उत्पादन होत नव्हते. पण त्यांचे विधान असत्य आहे. सीव्ही रामण यांना १९३० साली नोबल पारितोषिक मिळाले होते. भारतीय विज्ञान संस्थेची (बंगळुरू) १९०९ साली स्थापन करण्यात आली होती. पण तरी नेहरूंच्या आगमनानंतरच देशात सर्वकाही सुधारणा झाली, असे काँग्रेसचे म्हणणे आहे”, असाही आरोप त्रिवेदी यांनी केला.

त्रिवेदी पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात चुकीचे फोटो वापरले गेले, हा मोठा विषय नाही. पण ते फोटो विदेशातले आहेत, हा चिंतेचा विषय आहे. आतापर्यंत काँग्रेस नेते विदेशात जाऊन भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी करत होते. पण आता तर ते विदेशातले फोटो आणि त्यांचा जाहीरनामाच उचलत आहेत.

पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी इच्छुक?

काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली आहेत, ती त्यांनी स्वतःच्या शासन काळात कधीच पूर्ण केलेली नाहीत. मग त्यांचे सरकार केंद्रात असो किंवा कोणत्याही राज्यात असो…, अशीही टीका त्रिवेदी यांनी केली.