कोल्हापूरमध्ये काँग्रेसने छत्रपती शाहू यांना उमेदवारी देऊन महायुतीसमोर तगडे आव्हान निर्माण केले. शाहू महाराजांना निवडणुकीत पिछाडीवर टाकण्यासाठी विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी कोल्हापूरच्या गादीचा वाद उकरून काढला. त्यानंतर ‘मान गादीला आणि मत मोदीला’ अशी घोषणा दिली गेली. आता शाहू महाराजांचा विरोध करण्यासाठी आणि महायुतीचा प्रचार करण्यासाठी धुळ्याचे नेते आणि स्वत: शाहू महाराज यांचे थेट वशंज म्हणवून घेणाऱ्या राजवर्धन कदमबांडे यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापूरमध्ये (दि. २७ एप्रिल) रोजी सभा पार पडल्यानंतर राजवर्धन कदमबांडे कोल्हापूरात आले असून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली.

कदमबांडे यांनी आज पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना विविध विषयांवर भाष्य केले. तसेच महायुतीचे उमेदवार जिंकून येतील, असा विश्वास व्यक्त केला. “मी शाहू महाराज यांचा पणतू आणि प्रिन्सेस पद्मराजे यांचा चिरंजीव आहे. मी छत्रपती शाहू यांचा रक्ताचा वारसदार म्हणून कोल्हापूरच्या जनतेला आवाहन करण्यासाठी आलो आहे. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मी कोल्हापूरमध्ये आलो आहे. १९६२ साली कोल्हापूरात दत्तक घेण्याचे प्रकरण गाजले होते. आताचे छत्रपती शाहू हे खरे वारसदार नाही. ते स्वतःला गादीचे वारसदार म्हणत असले तरी खरा वारसदार कोण? हे जनता ठरवेल”, असे राजवर्धन कदमबांडे म्हणाले.

ajit pawar visit at rajkot fort malvan
Ajit Pawar : “शिवरायांच्या नावाला साजेसं स्मारक उभारणार”; राजकोट किल्ल्याच्या पाहणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; ठाकरे-राणे वादावर म्हणाले…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Sharmila Thackeray on Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse
Sharmila Thackeray : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शर्मिला ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या, “कोकणातील लोक कोणत्या रक्ताचे…”
malvan Shivaji maharaj statue collapse
शिल्पकार आणि सल्लागार ‘गायब’
Rajendra Raut, Manoj Jarange,
सोलापूर : ओबीसीतून मराठा आरक्षणप्रश्नी पवार, ठाकरे, पटोलेंच्या सह्या आणा; राजेंद्र राऊत यांचे मनोज जरांगे यांना आव्हान
Aaditya Thackeray
Aditya Thackeray : “ही निवडणूक आहे, लढाई नाही, त्यामुळे राजकीय पक्षांनी…”; छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया!
Kolhapur Girl assaulted and Killed
Kolhapur Girl Abuse and Murder: कोल्हापूर हादरलं! १० वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस माहिती देताना म्हणाले, “काल रात्री…”
Ramgiri Maharaj, Prophet Muhammad,
Ramgiri Maharaj : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल

महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू यांना एमआयएमने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. याबद्दल प्रश्न विचारला असता कदमबांडे म्हणाले की, कुणाचा पाठिंबा घ्यावा हे शाहू महाराजांनी ठरवायचे आहे. मी धुळ्यातून अपक्ष निवडणूक लढविली. त्यावेळी एमआयएमचा उमेदवार माझ्याविरोधात होता. केवळ २३०० मतांनी तो निवडून आला. भूतकाळात मुघलांनी हिंदूंची अनेक मंदिरे उध्वस्त केली, त्यामुळे अशा लोकांचा पाठिंबा घ्यायचा की नाही, हे त्यांनी (शाहू महाराज) ठरवावे, असेही आवाहन कदमबांडे यांनी केले.

याचवेळी कोल्हापूरमध्ये प्रचारासाठी का आले?

राजवर्धन कदमबांडे यांचे वास्तव्य धुळे जिल्ह्यात आहे. तसेच धुळ्याच्या राजकारणात ते सक्रिय आहेत. याआधी कदमबांडे कोल्हापूरमध्ये फारसे हस्तक्षेप करत नसत किंवा प्रचारासाठी येत नसत. याचवेळी कोल्हापूरमध्ये महायुतीचा प्रचार करण्यामागे काय कारण? असाही प्रश्न पत्रकारांनी यावेळी विचारला. त्यावर मी नेहमीच कोल्हापूरमध्ये येत असतो, असे उत्तर त्यांनी दिले. तसेच पक्षाने यावेळी जबाबदारी टाकल्यामुळे हातकंणगले आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रचार करत आहे, असेही ते म्हणाले.

भाजपाने जाणूनबुजून कोल्हापूरात पाठविले का?

यंदा छत्रपती शिवाजी महाराज हे महायुतीच्या विरोधात निवडणुकीला उभे असल्यामुळे भाजपाने मुद्दामहून तुम्हाला प्रचारासाठी पाठविले का? असाही प्रश्न कदमबांडे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, हे पत्रकारानींच ठरविले आहे. मात्र भाजपाही शाहू महाराजांच्या विचारांना मानणारा पक्ष आहे. भाजपा शाहू महाराजांच्या विचारांच्या विरोधात नाही.