मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील चित्र स्पष्ट झालं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे. तर, काँग्रेसने तेलंगणात सत्ता खेचून आणली आहे. पण, राजस्थान आणि छत्तीसगडसारखी राज्ये काँग्रेसला गमावावी लागली आहेत.

यावर्षी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेल्या आम आदमी पक्षाने ( आप ) मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये निवडणूक लढवली होती. ‘आप’चे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तीनही राज्यांत मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता. तरीही, ‘आप’ला तीनही राज्यांमध्ये खातंही उघडता आलं नाही.

tribal demand for Bhil Pradesh has returned to haunt Rajasthan politics
राजस्थानच्या राजकारणात स्वतंत्र ‘भिल प्रदेश’ राज्याची मागणी का जोर धरू लागली आहे?
Union Budget 2024
Budget 2024 for Nitish-Naidu: नितीश कुमार आणि चंद्राबाबूंना मोदी सरकारचं ‘रिटर्न गिफ्ट’, दोन राज्यांसाठी घोषणांचा पाऊस
Loksatta karan rajkaran Will the Thackeray group leave the seat for the Congress from the Versova assembly constituency of North West Mumbai Constituency
कारण राजकारण : वर्सोव्याची जागा काँग्रेसला सोडणार?
akola , eknath shinde, eknath shinde news,
पश्चिम वऱ्हाडाला शिवसेना शिंदे गटाकडून बळ, केंद्रीय राज्यमंत्री व विधान परिषद सदस्यत्व
Armstrong
तामिळनाडूत खळबळ, बसपाचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची धारदार शस्त्रांनी चेन्नईत हत्या
bjp face tough battle in haryana jharkhand assembly election opposite in confidence after lok sabha election results
विश्लेषण : हरियाणा, झारखंडमध्ये विधानसभेला भाजपची कसोटी; लोकसभा निकालाने विरोधकांना आत्मविश्वास?
bjp president jp nadda announces in charges for 24 states
भाजपकडून २४ राज्यांमध्ये नवे प्रभारी
How Rashtriya Lok Dal RLD has steered itself to four Houses
ना कुणाशी मैत्री, ना शत्रुत्व; राजकीय विजनवासात गेलेल्या रालोद पक्षाने कशी घेतली उभारी?

हेही वाचा : राजस्थानमध्ये मोदी, ध्रुवीकरण, जातींच्या आधारावर भाजपची सत्तेवर पकड

गुजरात विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने चमकदार अशी कामगिरी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये ‘आप’ने उमेदवार उभे केले होते. पण, ‘आप’ला यश मिळालं नाही.

‘आप’ने २७० जागा असलेल्या मध्य प्रदेशात ७० हून अधिक उमेदवार उभे केले होते. १९९ जागा असलेल्या राजस्थानमध्ये ८८ आणि ९० जागा असलेल्या छत्तीसगडमध्ये ५७ उमेदवार उभे केले होते. मात्र, तीनही राज्यांमध्ये केजरीवालांना मोठा झटका बसला आहे. एकाही उमेदवाराला छाप पाडता आली नाही. सर्व उमेदरावांची अनामत रक्क जप्त झाली आहे.

हेही वाचा : मध्य प्रदेशमध्ये भाजपाचा बोलबाला, शिवराजसिंह चौहान यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळणार का?

‘आप’ला छत्तीसगडमध्ये ०.९४ टक्के मते मिळाली आहे. तर, मध्य प्रदेशात ०.४४ टक्के आणि राजस्थानमध्ये ०.३८ टक्के मते मिळाली आहेत.