लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी पार पडलं. यामध्ये मुंबईमधील सहा मतदारसंघ आणि भिवंडी, नाशिक, दिंडोरी, धुळे, ठाणे, कल्याण, पालघर, या मतदारसंघात मतदान झालं. महाराष्ट्रात एकूण ५४.३३ टक्के मतदान झालं. मुंबईत अनेक मतदार केंद्रावर संथ गतीनं मतदान पार पडलं. असं असलं तरी मुंबई उपनगरातील कुर्ला, वांद्रे, मालवणी, चांदिवली, मीरा रोड आणि मुंब्रा येथील अल्पसंख्याक भागात वेगाने मतदान झाल्याचं दिसून आलं.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन वर्षात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या समीकरणामुळे यंदाची निवडणूक वेगळी ठरली. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रावादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस आहेत. त्यामुळे अनेक जणांना ज्या पक्षात आहेत त्या पक्षाला मतदान न करता आघाडीतील पक्षाला मतदान करावं लागलं. आता काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनीही आपण कट्टर काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत, पण यावेळी पहिल्यांदा शिवसेना ठाकरे गटाला मतदान केल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

urad, soybean, Solapur, rain, Kharif,
सोलापूर : पोषक पाऊसमानामुळे दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रात उडीद व सोयाबीनचा पेरा, १७० टक्क्यांवर खरीप पेरण्या
The number of men committing suicide on railway track is higher mumbai The number of men committing suicide on railway track is higher mumbai
रेल्वे मार्गावर दररोज तीन ते चार आत्महत्या; आत्महत्या करण्यात पुरुषांची संख्या अधिक
Malad, Malad Manori Roads, Malad Manori Roads in Poor Condition, Mira Bhayander Municipal Corporation Bus Service, bmc, Mumbai municipal corporation, Mumbai news, marathi news, loksatta news, latest news,
मनोरीतल्या रस्त्यांची दुरवस्था, मीरा भाईंदर पालिकेच्या बसचालकांची मुंबई महापालिकेविरोधात तक्रार
Zika, Pune, rural areas, patients,
पुण्यात झिकाचा धोका वाढला! ग्रामीण भागातही शिरकाव; जाणून घ्या कुठे वाढताहेत रुग्ण…
Heavy rainfall causes flooding in Mumbai
प्रशासनाचे दावे पाण्यात; पहिल्या मोठ्या पावसात मुंबईची दाणादाण; रस्त्यांवर पाणी, रेल्वे ठप्प
mumbai schools holiday news
मुंबई महापालिका हद्दीतील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; मुसळधार पावसामुळे पालिका प्रशासनाचा निर्णय
Flood-like conditions at many places in Raigad Schools holiday in Alibag Murud
रायगडाला पावसाचा तडाखा… अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती; अलिबाग मुरूड मध्ये शाळांना सुट्टी
Mumbai has recorded over 300 mm rainfall in six hours
मुंबईत सहा तासांत ३०० मिमी पावसाची नोंद, ‘कोसळधारां’मुळे मायानगरीचा वेग मंदावला

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांचे मतदारांना खुले पत्र, “लोकशाहीच्या उत्सवात मतदारांच्या मनामनात मोदी, ४ जूननंतर..”

अल्पसंख्याक भागात मतदानाचा टक्का वाढला?

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील अल्पसंख्याक भागात जोरदार मतदान झाल्याचं सांगितलं जात आहे. माजी मंत्री नसीम खान आणि काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी अल्पसंख्याक भागात मोठ्या प्रमाणात मतदान झाले असल्याचं म्हटलं आहे. तसंच समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी महाविकास आघाडीच्या यशाची अपेक्षा व्यक्त केली.

नसीम खान काय म्हणाले?

“अल्पसंख्यांकांमध्ये मतदानाचा उत्साह पाहून आनंद झाला. भर उन्हातही धीर धरून ते आपला हक्क बजावण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहिले. अल्पसंख्याकांकडून मतदानाला इतका सकारात्मक प्रतिसाद आपण कधीही पाहिला नव्हता”, असं प्रदेश काँग्रेसचे नेते आरिफ नसीम खान म्हणाले.

मुंबई उत्तर मध्यमधील एका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने सांगितलं की, “बिगर काँग्रेस उमेदवार असलेल्या जागांवरही अल्पसंख्याकांकडून चांगलं मतदान झालं. त्यामुळे आता हे स्पष्ट झालं आहे की, अल्पसंख्याकांनी एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, बसपा या सारख्या पक्षांना नाकारले आहे. त्यामुळे येणारा निकाल अनेकांना धक्का देईल”, असं ते म्हणाले.

पहिल्यांदा शिवसेनेला मतदान केलं

मुंबई दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी शिवसेनेचे अरविंद सावंत मोठ्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. कट्टर शिवसैनिक हे अल्पसंख्याकांबरोबर आहेत. मी काँग्रेसचा असून नेहमी ‘हाता’च्या चिन्हाला मतदान केलं. मात्र, यावेळी पहिल्यांदा शिवसेना ठाकरे गटाला मत केलं असल्याचं अमीन पटेल यांनी सांगितलं.