शरीराच्या नियमित वाढीसाठी आणि देखभालीसाठी जीवनसत्त्वांची आवश्यकता असते. मात्र बहुतांश जीवनसत्त्व शरीरात तयार होत नसल्याने आहारातून ती घेणे गरजेचे ठरते. काही जीवनसत्त्व पाण्यात विरघळणारी असतात. त्यामुळे ती मूत्रावाटे शरीराबाहेर पडतात. त्यामुळे ती आहारातून दररोज घेणे आवश्यक ठरते. ‘ब’ जीवनसत्त्व (ब१, ब२, ब६ आणि ब१२) आणि ‘क’ जीवनसत्त्व पाण्यात विरघळतात. ‘अ’, ‘ड’, ‘ई’ आणि ‘के’ जीवनसत्त्व मात्र पाण्यात विरघळणारी नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खनिजे –  शरिरातील केवळ चार ते पाच टक्के भाग हा खनिजांचा बनलेला असला तरी स्वास्थ्यासाठी ती अत्यावश्यक ठरतात. पाणी तसेच आहारातून खनिजे मिळू शकतात. खनिजेदेखील शरीरात तयार होत नसल्याने आहारातून त्यांचा पुरवठा करणे आवश्यक ठरते.

मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need of vitamins in body
First published on: 22-04-2014 at 01:02 IST