कोल्हापूर : सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी कायद्यानुसार एकरकमी देणे बंधनकारक आहे मात्र त्याचे उल्लंघन करून ती वेगवेगळ्या टप्प्यात तुकड्यांनी देण्याचा निर्णय काही कारखान्यांनी घेतला आहे.एफआरपीची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ नांद्रे ता. मिरज येथे राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत कारखानदारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.