स्वागत कमान लावण्याच्या कारणावरून येथील शिवाजी पेठेतील दोन मंडळांमध्ये शनिवारी सकाळी तुफान दगडफेक झाली. यामुळे उभा मारुती चौकात वातावरण तणावपूर्ण बनले होते. दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. दोन्ही तरुण मंडळाच्या १० कार्यकर्त्यांना जुना राजवाडा पोलिसांना ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवाजी पेठेतील महाकाली तालीम मंडळाच्या गणपतीशेजारीच संध्यामठ तरुण मंडळाचा गणपती बसवला जातो. शनिवारी रात्री महाकाली तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रंकाळ्याकडील बाजूस स्वागत कमान उभी केली होती. यावेळी संध्यामठ तालमीच्या कार्यकर्त्यांनी यास आक्षेप घेतला. कमान उभी करायची नाही यातून दोन्ही मंडळाचे कार्यकत्रे आमने सामने आले. दोन्ही तालमीच्या ज्येष्ठ मंडळींनी हा वाद शनिवारी रात्रीच मिटवला होता.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh mandal fight with each other over welcome board
First published on: 11-09-2016 at 02:18 IST