कोल्हापूर : गोकुळने सीमाभागातील कमी केलेले दूध खरेदी दर पूर्ववत करावेत, अशी मागणी बेळगावातील दूध उत्पादक शेतकरी तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे. गोकुळने सीमाभागातील दूध दर कमी केले असल्याने त्यावर सीमाभागात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नुकतेच गोकुळच्या अधिकाऱ्यांना चिलिंग सेंटर मध्ये कोंडून ठेवण्याचा प्रकार गळतगा या सीमाभागातील गावात घडला होता.

बेळगाव निपाणी भागातील बहुतांश दूध उत्पादक शेतकरी गोकुळला (कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ) दूध पुरवठा करतात. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सीमाभागातील म्हशीच्या व गाईच्या दुधाच्या खरेदी दरात कपात केली आहे. आधीच पशुखाद्य व वैरणीचे दर भरमसाठ वाढले असताना फक्त सीमाभागातील दूध दर कमी करणे हा सीमाभागातील शेतकऱ्यांवर अन्याय आहे. या निर्णयामुळे सीमाभागातील शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

Ambad project affected people adamant on agitation half-naked march till Loni
अंबड प्रकल्पग्रस्त आंदोलनावर ठाम, लोणीपर्यंत अर्धनग्न मोर्चा
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
JP Gavit, pesa recruitment, Nashik, JP Gavit agitation
नाशिक : पेसा भरतीसाठी आंदोलन तीव्र करणार – जे. पी. गावित यांचा इशारा
dam
महाराष्ट्रातील सिंचन व्यवस्था म्हणजे अनागोंदी आणि विषमतेची महायुती
tourist bus and houseboat project under sindhuratna development scheme
रत्नागिरीत महिला बचत गट सक्षम करण्यासाठी सिंधुरत्न विकास योजनेंतर्गत पर्यटन बस व हाऊसबोट प्रकल्प
nashik district bank farmers protest marathi news
नाशिक : स्वातंत्र्यदिनी हजारो शेतकऱ्यांकडून नादारीची घोषणा, शेतकरी समन्वय समितीचा निर्णय
Mahaakrosh Morcha, Ratnagiri Collector,
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी महाआक्रोश मोर्चा
thane district, Barvi dam, eople on the banks of the river are alerted, marathi news, marathi updates
बारवी धरण काठोकाठ, बारवी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हेही वाचा : माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर

मंत्र्यांना साकडे

महाराष्ट्र शासन जसे नेहमी सीमाभागातील जनतेला महाराष्ट्रीयन समजते तशीच वागणूक देऊन कोल्हापूरप्रमाणेच सीमाभागातील शेतकऱ्यांना सुद्धा खरेदी दर द्यावा, अशी मागणी सीमाभागातील शेतकऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने कृषी मंत्री धनंजय मुंडे, गोकुळचे नेते व पालकमंत्री हसन मुश्रीफ, गोकुळचे नेते व आमदार सतेज पाटील, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्याकडे केली आहे.