कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत झालेल्या शासन निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया देणे व आनंदोत्सव साजरा करणे हे योग्य व न्यायाचे ठरणार नाही, अशी भूमिका सकल मराठा समाज, कोल्हापूर यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई (वाशी) येथे मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ कोल्हापुरातील सकल मराठा समाज सक्रिय होता व आहे. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे या भूमिकेशी आम्ही आजही ठाम आहोत. मनोज जरांगे पाटील यांच्या कालच्या वाशीच्या आंदोलनाविषयी मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भातील सर्व मागण्या मान्य झाल्या अशा बातम्या ऐकिवात व वाचण्यात आल्या. गेल्या दोनवेळा शासनाकडून आरक्षणाची फसगत याचा पूर्वानुभव लक्षात घेता कालचा शासन निर्णय व त्या संदर्भातील कागदपत्रे याचा कोल्हापुरातील ज्येष्ठ विधिज्ञामार्फत अभ्यास होणे अत्यंत आवश्यक आहे. याच्याशिवाय मराठा आरक्षणाबाबत झालेल्या शासन निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया देणे व आनंदोत्सव साजरा करणे हे योग्य व न्यायाचे ठरणार नाही, असे सकल मराठा समाज, कोल्हापूरतर्फे सांगण्यात आले.

High Court said demanding money by Gesture is not corruption
उच्च न्यायालय म्हणाले, इशाऱ्याने पैशाची मागणी करणे भ्रष्टाचार नव्हे…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
badlapur case protest mahavikas aghadi
राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार आहे का? बदलापूर प्रकरणातील बंदविरोधात न्यायालयाने काय निर्णय दिला?
is offices safe for woman to work
तुमचं कार्यालयीन ठिकाण सुरक्षित आहे का?
eknath shinde kiran mane
Badlapur Case : “हा नराधम माणूस म्हणवण्याच्या लायकीचा नाही”, किरण मानेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल; म्हणाले, “बदलापूरबाबत थापा मारणारा…”
Ambadas Danve, badlapur school case,
उद्यापासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन छेडणार, अंबादास दानवे यांचे वक्तव्य
Mahayuti government
हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या सरकारवर हिंदू जनजागृती समितीची नाराजी; देवस्थान जमिनीच्या निर्णयावर टीका
jitendra awhad on uddhav thackeray
Jitendra Awhad : “महाराष्ट्रात अराजकता माजली आहे”, उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्यावरून जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “फक्त एवढेच लक्षात ठेवा…”

हेही वाचा – ‘गोकुळ’ चा गाय दुधाला शासन अनुदानासह प्रतिलिटर चक्क ३८ रुपये खरेदी दर

हेही वाचा – ‘अदानी’च्या विरोधातील कोल्हापूरकरांच्या राजकीय लढ्याला यश

आजच्या शासनाकडून अध्यादेशासंदर्भात झालेल्या घोषणा न्यायालयात टिकणार की नाही ? याची आम्ही उद्या रविवारी कोल्हापूर प्रेस क्लब दसरा चौक येथे दुपारी सर्वसमावेशक चर्चा करू आणि त्या चर्चेतून जो निर्णय होईल त्याच्यावर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असे सकल मराठा समाज कोल्हापूर यांनी पत्रकात म्हटले आहे.