भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेपूर्वी १४ दिवसांचा विलगीकरण कालावधी अनिवार्य असल्यामुळे बीसीसीआयने २६ जणांचा भारतीय संघ पाठवावा, असे मत राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके  प्रसाद यांनी व्यक्त केले आहे.

‘‘युवा खेळाडू संधीची वाट पाहत आहेत, याकडे संघ व्यवस्थापनाने लक्ष देणे गरजेचे आहे.  या प्रक्रियेदरम्यान भविष्यातील गुणवत्ता शोधता येतील. २६ जणांचा संघ पाठवून दोन गटात विभागणी केल्यास सराव सामन्यांसाठी मदत होईल,’’ असे प्रसाद म्हणाले.