श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने ४-१ असा विजय मिळवल्यास दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांना मागे टाकून भारताला जागतिक एकदिवसीय क्रमवारीतील अग्रस्थान गाठता येईल. जर भारताने ४-१ अशी मालिका जिंकली तर त्यांचे आघाडी स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेइतकेच ११५ गुण होतील. मात्र दशांशांपर्यंत हे गुण मोजले गेले तर भारत आफ्रिकेला मागे टाकेल. जर भारताने ५-० असा विजय मिळविल्यास ते आफ्रिकेपेक्षा दोन गुणांनी वर जातील व अव्वल स्थानावर थेट पोहोचतील.