न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर मात करुन ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. आतापर्यंत भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये एकही टी-२० सामना जिंकू शकला नव्हता, हा भारतीय संघाचा न्यूझीलंडमधला पहिला विजय ठरला आहे. ३ बळी मिळवत कृणाल पांड्याने न्यूझीलंडच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. या कामगिरीसह कृणाल पांड्या न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत टी-२० सामन्यात दोनपेक्षा जास्त बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. पांड्याने कर्णधार केन विल्यमसन, कॉलिन मुनरो आणि डॅरेल मिचेलला माघारी धाडलं.