निदहास चषकात भारताने बांगलादेशवर अंतिम सामन्यात मात करुन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. विजयासाठी अखेरच्या चेंडूवर ५ धावांची आवश्यकता असताना दिनेश कार्तिकने षटकार खेचत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विजयानंतर सर्वच स्तरातून कार्तिकच्या खेळीचं कौतुक होतं आहे.

अवश्य वाचा – Video: अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत कार्तिक ठरला हिरो, तो क्षण पुन्हा एकदा अनुभवायचा आहे??

या विजयानंतर दिनेश कार्तिकनेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट करत बांगलादेशविरुद्ध केलेली खेळी आपल्या आयुष्यातली सर्वोत्तम खेळी असल्याचं म्हटलं आहे. माझ्यासाठी आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस असल्याचंही कार्तिकने मान्य केलं.

अवश्य वाचा – ….म्हणून रोहित शर्माने दिनेश कार्तिकचा तो षटकार पाहिलाच नाही!

तिरंगी मालिका संपल्यानंतर दिनेश कार्तिक आगामी इंडियन प्रिमीअर लिगचे सामने खेळणार आहे. यंदाच्या हंगामात दिनेश कार्तिककडे कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे तिरंगी मालिकेनंतर आयपीएलमध्ये कार्तिक कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – भारताची बांगलादेशवर मात, अंतिम सामन्यात झालेले हे १३ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का?