Women's T20 World Cup 2020 Ind Vs Aus : टी २० विश्वचषक २०२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दणदणीत पराभव करत पाचवे टी २० विश्वविजेते पटकावले. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना अक्षरश: ठोकून काढले. त्यानंतर डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिला फलंदाजांनी अत्यंत दीनवाणी कामगिरी केली. शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, जेमायमा रॉड्रीग्ज या भरवशाच्या फलंदाजांनी दडपणाखाली अतिशय बेजबाबदार हवाई फटके खेळत आपल्या विकेट्स ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना बहाल केल्या. त्यामुळे भारतीय संघाला तब्बल ८५ धावांनी हार पत्करावी लागली. धमाकेदार फलंदाजी करणारी एलिसा हेली सामनावीर ठरली. Women's #T20WorldCup winners: 2009 - 2010 - 2012 - 2014 - 2016 - 2018 - 2020 - On another level. pic.twitter.com/CNQ5zvJCxG — T20 World Cup (@T20WorldCup) March 8, 2020 नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन सलामीवीर बेथ मूनी आणि एलिसा हेली यांनी धडाकेबाज सुरूवात करत ५ षटकांत ४७ धावा ठोकल्या. क्रिकेटपटू मिचेल स्टार्कची पत्नी आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची सलामीवीर एलिसा हेली हिने ३० चेंडूत धमाकेदार अर्धशतक ठोकले. तिने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. याच सामन्यात तिने २ हजार टी२० धावांचा टप्पादेखील गाठला. धडाकेबाज अर्धशतकी खेळीनंतर एलिसा हेली झेलबाद झाली आणि भारताला पहिले यश मिळाले. तिने ३९ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावा केल्या. धडाकेबाज अर्धशतकी खेळीनंतर एलिसा हेली झेलबाद झाली आणि भारताला पहिले यश मिळाले. तिने ३९ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावा केल्या. त्यानंतर सलग तीन सामन्यांत चांगली कामगिरी करणाऱ्या सलामीवीर बेथ मूनीने या सामन्यात संयमी अर्धशतक केले. तुफान फटकेबाजी सुरू असताना दिप्ती शर्माने एकाच षटकात दोन बळी टिपले. आधी कर्णधार मेग लॅनिंग १६ धावांवर बाद झाली. पाठोपाठ गार्डनरही २ धावांत माघारी परतली. पण बेथ मूनीने नाबाद ७८ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला १८४ धावसंख्या गाठून दिली. संपूर्ण स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी अंतिम सामन्यात प्रचंड धावा खर्च केल्या. Australia finish on 184/4 India require the highest ever Women's #T20WorldCup chase. Can they make history? SCORE pic.twitter.com/ZtC4OCjpVg — T20 World Cup (@T20WorldCup) March 8, 2020 या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी अतिशय खराब कामगिरी केली. भारताकडून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी सलामीवीर शफाली वर्मा ही अंतिम सामन्यात अयशस्वी ठरली. सामन्याच्या तिसऱ्याच चेंडूवर ती २ धावा काढून बाद झाली. त्यानंतर दुखापतग्रस्त तानिया भाटीयाच्या जागी मैदानावर आलेली जेमायमा रॉड्रीग्ज शून्यावर माघारी परतली. आधीच्या षटकात २ चौकार लगावलेली स्मृती मानधना ११ धावा करून बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौर ४ धावांवर माघारी परतली. दिप्ती शर्माने झुंज देत सर्वाधिक ३३ धावा केल्या. पण इतर फलंदाजांनी साफ निराशा केली. भारताचे तब्बल ६ फलंदाज एक आकडी धावसंख्येवर बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शूटने सर्वाधिक ४ बळी टिपले.