कर्नाटकविरुद्ध होणाऱ्या रणजी क्रिकेट करंडकाच्या उपांत्य फेरीसाठी फिरकीपटू अक्षय गिरपला अपघातातील दुखापतीमुळे मुकावे लागणार आहे. उपान्त्य फेरीचा सामना २५ फेब्रुवारीपासून बंगळुरू येथे होणार आहे.
‘‘उपांत्य फेरीसाठी रविवारी संघनिवडीनंतर अक्षयला संधी देण्यात आली होती. पण दुचाकी वाहनावरून जाताना अक्षयचा अपघात झाला असून तो उपांत्य फेरीच्या लढतीसाठी संघासाठी उपलब्ध होऊ शकणार नाही. त्याच्याऐवजी संघामध्ये ऑफ स्पिनर मैराज खानचा समावेश करण्यात आला आहे,’’ अशी माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) संयुक्त सचिव नितीन दलाल यांनी दिली.
मुंबईचा संघ : आदित्य तरे (कर्णधार), अभिषेक नायर, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सुफियॉन शेख, शार्दूल ठाकूर, निखिल पाटील, अखिल हेरवाडकर, श्रीदीप मंगेला, विल्किन मोटा, तुषार देशपांडे, मैराज खान, हरमीत सिंग आणि बलविंदरसिंग संधू. प्रशिक्षक : प्रवीण अमरे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay girap injured in bike accident will miss ranji semifinals
First published on: 24-02-2015 at 01:02 IST